शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अनेक जिल्ह्यात हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान; अनिल देशमुख यांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 09:37 IST

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारने करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

शेतकऱ्यांचे प्रश्न असताना दुःखाची अशी गोष्ट आहे की, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज्याच्या बाहेर प्रचाराच्या दौऱ्यासाठी व्यस्त आहे. अतिवृष्टीच्या पुराने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र अजून सुद्धा त्या पुराची पैसे शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळाले नाही याची सुद्धा नुकसान भरपाई या जिल्ह्यामध्ये देण्यात यावी, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 

मराठवाडा व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते, मात्र कापसाला भाव मिळत नाही. कापसाची विदेशातून भारतामध्ये आयात करण्यात आले. आयात केल्याच्यानंतर ११ टक्के कॉटन ऑफ इंडिया असोसिएशनच्या दबावाखाली रद्द करण्यात आला. व्यापाराच्या फायद्यासाठी ११ टक्के आयात कमी करण्यात आला. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले कापसाची प्रदेशात निर्यात करण्यासाठी सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली. 

मागच्या वर्षी तरी आठ हजार रुपये कापसाला भाव मिळाला मात्र यावेळेस कापसाला भाव सात हजार रुपये आहे. उत्पादन खर्च जास्त आहे, त्याकडे सरकारचं लक्ष नाही कापसाला भाव नसल्याने अतिशय दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांची असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी जे एक महिन्यापासून उपोषण करत आहे त्याच्याकडे सुद्धा राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी