शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

गणेशोत्सव तोंडावर, तरीही यवतमाळात रस्त्यांची चाळणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 9:56 PM

सर्वांना प्रतीक्षा असलेला गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र यावेळी रस्त्यांवरील खड्डे चुकवित गणरायाला आगमन करावे लागणार आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेच्या राजकारणात शहराची लागली वाट : गणरायाच्या आगमनात अडथळे, कार्यकर्त्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वांना प्रतीक्षा असलेला गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र यावेळी रस्त्यांवरील खड्डे चुकवित गणरायाला आगमन करावे लागणार आहे. कारण यवतमाळ शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या वर्चस्वाच्या राजकारणात शहराची पूर्णत: वाट लागली आहे. पालिकेत बांधकाम विभाग अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.यवतमाळात दुर्गोत्सवाचे महत्व असले तरी गणेशोत्सवही तेवढ्याच हर्षोल्हासात साजरा केला जातो. ग्रामीण भागातही अनेक सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची स्थापना केली जाते. घरोघरीही श्री गणेश विराजमान होतात. दरवर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या वाढते आहे. १३ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते या उत्सवाच्या तयारीलाही लागले आहे. परंतु त्यांना गणरायाचे आगमन कसे होणार याची चिंता भेडसावते आहे. कारण शहरातील रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. कुठे जीवन प्राधिकरणाने तर कुठे दूरसंचार विभागाने रस्ते खोदले आहे. काही ठिकाणी विकास कामाच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम झाले आहे. तर अनेक रस्त्यांवर कोणतेही कारण नसताना खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांसाठी त्या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा हे प्रमुख कारण ठरले आहे. अशा रस्ते व खड्ड्यांची संख्या अधिक आहे. विकास कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या आड हे भ्रष्टाचारामुळे पडलेले खड्डेही दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. या खड्डेयुक्त रस्त्यांवरुनच गणरायाचे आगमन करावे लागणार का या चिंतेत कार्यकर्ते आहेत. हे खड्डे असेच राहिल्यास गणरायालासुद्धा हे खड्डे चुकवित आगमन करावे लागणार आहे. या खड्ड्यांमुळे दहा दिवस गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान कार्यकर्त्यांपुढे राहणार आहे.या रस्त्यांवरील खड्ड्यांना यवतमाळ नगरपरिषदेचे राजकारण प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत तर बहुमत भाजपाचे आहे. मोठी विकास कामे झाल्यास सेनेला श्रेय मिळेल म्हणून शक्य असेल तेथे अडथळे निर्माण करण्याचा व सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा नगराध्यक्षांचा सूर आहे. तर नगराध्यक्षच विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. मात्र या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या राजकारणात यवतमाळकर नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकातच मुख्य मार्गाला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यावरून शहरातील अन्य मार्ग आणि नव्याने समाविष्ठ जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पना येते.आधीच खड्डे त्यात पाऊस आल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांच्या गाड्या स्लीप होऊन हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीचे, मणक्यांचे आजार वाढले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी अजूनही नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडून पाहिजे त्या गतीने प्रयत्न होताना दिसत नाही. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येत नाहीत हा नियम आवर्जुन या विभागाकडून सांगितला जातो. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी लाल मुरुम टाकला गेला आहे. मात्र पावसात कुठे तो वाहून गेला तर बहुतांश ठिकाणी या मुरुमामुळे रस्त्याची स्थिती आणखी बिघडली आहे. मुरुमामुळे मोठ्या प्रमाणात वाहने कोलमडू लागली आहे. श्री गणरायाचे आगमन अशा खड्डेयुक्त रस्त्यांमधूनच करायचे काय? असा सवाल गणेशभक्तांकडून नगरपरिषदेला विचारला जात आहे.सर्वत्र भाजपाचीच सत्ता, तरीही वाताहतयवतमाळ पालिकेवर भाजपाची सत्ता आहे, शहराचे आमदार भाजपाचे आहे, आणखी त्यांच्याकडे राज्यमंत्री पद व पालकमंत्री पदही आहे. त्यानंतरही यवतमाळ शहर खड्डेमय झालेले पहावे लागत असेल तर या भाजपाच्या सत्तेचा यवतमाळकरांना उपयोग काय असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.गणराया, पालिकेला खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी द्याकिमान गणरायाच्या आगमनापूर्वी तरी हे खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी यवतमाळ नगरपरिषदेचे पदाधिकारी, प्रशासन आणि विशेषत: बांधकाम विभागाला सूचते का? याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाYavatmalयवतमाळ