शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

बदलत्या वातावरणाने कृषी उत्पादन गारद

By admin | Published: January 08, 2016 3:10 AM

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती.

कापसावर तेल्या रोग : एक महिन्यापूर्वीच तुरीचा हंगाम संपलारूपेश उत्तरवार यवतमाळ दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती. भाव तर मिळाला नाहीच, पण रोगांच्या आक्रमणाने बहुतांश शेतकऱ्यांची उभी पऱ्हाटी वाळून गेली. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा हा दुष्परिणाम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना अजूनही दृष्टिपथात नाहीत. ही कथा केवळ कापसाचीच नाही, तर खरिपातील सोयाबीन आणि तुरीलाही फटका बसला आहे. अन् आता रब्बी पिकांनाही बदलत्या वातावरणाची झळ पोहोचली आहे.ग्लोबल वार्मिंगने ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. पावसाळा एक महिना पुढे सरकला आहे. थंडीच्या महिन्यात थंडी पडेनाशी झाली. याचा परिणाम थेट कृषी क्षेत्रावर पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे होते. त्या खालोखाल सोयाबीन आणि तूर पीक घेण्यात आले. खरिप हंगाम संपण्यात जमा झाला आहे. कोरडवाहू क्षेत्रात उलंगवाडीची स्थिती आहे. ओलिताची अवस्था अशीच बिकट होत आहे.ढगाळी वातावरण आणि धुवारीमुळे कापसाचे पीक प्रभावित झाले आहे. कपाशीवर तेल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे पाने करपायला सुरवात झाली आहे. पान तेलकट आणि काळे पडत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हादरले आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकऱ्यांना एकरी काही किलो आणि क्विंटलचा अ‍ॅव्हरेज आला. तर ओलितात दोन अथवा तीन क्विंटलचा सरासरी वेचा निघाला आहे. सोयाबीन आणि कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीला मूठभर शेंगा आणि हिरवा पालाच राहीला. बदलत्या वातावरणाने तुरीवर किडीचे आक्रमण झाले. धुवारीने गळ झाली. सात बारांपैकी काही बार फळलेच नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यात निघणारी तूर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांचा दारात आली. परंतु, त्यातून २-४ कट्टे तूर निघणेही अवघड झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून थ्रेशर मशिन माघारी फिरल्या. तुरीला जरी चांगले दर असले, तरी शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचे उत्पादन नसल्यातच जमा आहे. गव्हाची आणि हरभऱ्याची स्थितीही भयावह आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतात गहू आणि हरभरा पेरला. मात्र थंडीचा पत्ताच नाही. या दोनही पिकांना थंडी आवश्यक आहे. थंडीअभावी गव्हाच्या उंबयांचा आकार निम्माच झाला आहे. थंडीअभावी हरभऱ्यावरही किडीचे आक्रमण झाले आहे. यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.