शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

काय सांगता, ४३६ रुपयात मिळवा दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:00 IST

जीवन ज्योतीने जागविली उमेद : चार हजार नागरिक पुढे सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत ४३६ रुपयात विमा संरक्षण दिले जाते. यात विमा संरक्षण घेतलेल्या कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारात मृत्यू झाल्यास योजनेतून दोन लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. यासाठी लाभार्थ्याला दरवर्षी योजनेत समाविष्ट होण्यासाठी रिनिव्ह करावे लागणार आहे.

१८ ते ५० वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत समाविष्ट होता येते. या योजनेत समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांचे बँक खाते अथवा पोस्ट खाते असणे बंधनकारक आहे. या खात्यातून लाभार्थ्यांचे पैसे थेट विमा रकमेत वळते होतात. या योजनेत वर्षाकाठी लाभार्थ्याला ४३६ रुपये भरावे लागतात. या योजनेत विमा रक्कम जमा झाल्यानंतर वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. आतापर्यंत तीन हजार ९४४ नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. 

काय आहे प्रधानमंत्री जीवनज्योती योजना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या योजनेत ४३६ रुपयात वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अपघाती निधन झाल्यावर ही मदत मोलाची ठरते. 

क्लेम कसा आणि कुठे करणार योजनेत क्लेमसाठी पोस्टमास्तरकडे अर्ज करायचा आहे. डेथ संदर्भात नॉमिनी अर्ज करायचा आहे. यानंतर या योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या वारसाच्या खात्यात ही रक्कम वळती होते.

तीन हजार ९४४ जणांनी भरले पैसे या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ९४४ जणांनी प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेतून स्वतःचे विमा संरक्षण करून घेतले आहे. या योजनेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे. यातून कुटुंबाला मदत होणार आहे.

"या योजनेकरिता अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी मोजकीच रक्कम वर्षभरासाठी गुंतवावी लागते. यामुळे ही योजना सर्वांना सोयीची ठरणारी आहे."- गजानन जाधव, डाक अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना