शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
2
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
3
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
4
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
5
PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट
6
Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक
7
२०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?
8
बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
9
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
10
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
11
जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन
12
Kojagiri Purnima 2024: कोजागरी विशेष 'हे' लक्ष्मी मंत्र; करतील कर्जमुक्त; वाचा हे विशेष तोडगे!
13
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला का खेळला जातो महाभोंडला? हा केवळ खेळ आहे की पुजा? वाचा!
15
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू
16
'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
17
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
19
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
20
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

हजार रुपये द्या अन् रेशनकार्ड न्या !

By admin | Published: October 16, 2015 2:26 AM

गोरगरिबांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशनकार्ड दिले जातात. मात्र यवतमाळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पैसे दिल्याशिवाय राशनकार्ड दिले जात नाही.

नियमांची पायमल्ली : पैसे देऊ न शकणाऱ्या नागरिकांना दोन वर्षे मारावे लागतात हेलपाटेहिवरी : गोरगरिबांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशनकार्ड दिले जातात. मात्र यवतमाळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पैसे दिल्याशिवाय राशनकार्ड दिले जात नाही. हजार रुपये द्या आणि रेशनकार्ड न्या, असा अलिखित नियमच या कार्यालयाने सुरू केला आहे.यवतमाळ तालुक्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांसह अनेकजण या गैरप्रकारात सामील आहेत. राशनकार्ड नसल्यामुळे स्वस्त धान्यापासून अनेकांना वंचित राहावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेला रेशनकार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. परंतु पैसे दिल्याशिवाय सहजासहजी रेशनकार्ड दिले जात नाही, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना हेही त्याचेच एक कारण असल्याचे सांगितले जाते. बहुतांश शेतकऱ्यांकडे आपले रेशनकार्डच नाही. त्यामुळे नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे. काहींनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडेही विचारपूस सुरू केली आहे. परंतु या दोन्ही ठिकाणी गोरगरीब जनतेची फसवणूक केली जात आहे. ७०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत मागणी केली जात आहे. एवढे पैसे मोजल्यास संबंधित व्यक्तीला एक किंवा दोनच दिवसात रेशनकार्ड दिले जाते. परंतु पैसे न देणाऱ्या व्यक्तीला तब्बल दोन वर्षे वाट पाहायला लावली जाते. शासनाचे अधिकारी गोरगरिबांची पिळवणूक करीत असल्याचे यावरून दिसते.(वार्ताहर)