शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भारतीय तृण धान्याला जगभरातून मागणी; शेतकऱ्यांना मिळणार आठ लाख किट्स

By रूपेश उत्तरवार | Published: May 26, 2023 8:00 AM

Nagpur News राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर तृणधान्याची किट दिली जाणार आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने हाती घेतले आहे.

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जागतिक पातळीवर साजरे केले जात आहे. मात्र, जगभरात तृणधान्याचा तुटवडा आहे. दुसरीकडे राज्यात तृणधान्याचे उत्पादन भुईसपाट झाले आहे. याला पुनरुज्जीवित करण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर किट दिली जाणार आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने हाती घेतले आहे.

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आराेग्य उत्तम राखण्यासाठी तृणधान्य हे पौष्टिक धान्य म्हणून ऊर्जा प्रदान करते. यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा आणि कोदो या धान्याचा समावेश आहे. यामुळे जगभरात या धान्याची मागणी वाढली आहे. तृणधान्याची मागणी वाढत असताना उत्पादन मात्र शून्य होण्याच्या वाटेवर आहे. शेतकरी अशा धान्याची लागवडच करीत नाही. बाजारात या धान्याला मागणी असतानाही याचे उत्पादन होत नाही, ही बाब लक्षात घेता, कृषी विभागाने याच्या मिनी किट तयार केल्या आहेत. त्या १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

यात खरीप ज्वारीचे बियाणे २०० ग्रॅम, बाजरी १०० ग्रॅम, राजगिरा १०० ग्रॅम, राळा २०० ग्रॅम आणि कोदो २०० ग्रॅम बियाणे दिले जाणार आहे. यातून उत्पादित धान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे. याशिवाय यातून बियाणे तयार करून पुढील दोन वर्षे शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येणार आहे. यामुळे तृणधान्याचे बियाणे घरीच तयार करता येणार आहे. अशा आठ लाख किट राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्याला तृणधान्याच्या दोन लाख किट दिल्या जाणार आहेत. यातून तृणधान्याची लागवड वाढेल. याच्या उत्पादकतेत भर पडण्यास मदत होणार आहे.

अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेती