शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

सरकार देशातील प्रत्येकाला घर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:04 AM

येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आर्णी येथे महिलांना शिलाई मशीनचे वाटप, सर्वपक्षीय स्नेहमिलन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ना.अहीर यांनी केंद्र शासनाने विविध क्षेत्रात अनेक चांगले निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत असल्याचेही स्पष्ट केले. जलयुक्त शिवारसारख्या योजनेमुळे जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशात यापुढे कुणीही बेघर राहणार नसून आवश्यक तेथे रस्ता, वीज, पाणी पोहोचविल्याचे सांगितले. देशाच्या सीमेवर तथा देशातही केंद्र सरकार जोरात काम करीत असल्याचे स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे दशाचे चित्र पालटत असल्याचा दावा त्यांनी केला. विविध योजनांमुळे अनेकचे आयुष्यच पालटल्याचे त्यांनी सांगितले. ना.नितीन गडकरी यांच्यामुळे देशात रस्ते विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी ना.अहीर यांच्या हस्ते तालुक्यातील २३ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. बांधकाम कारागिरांना साहित्य खरेदीसाठी निधी प्रदान केला. यावेळी आमदार राजू तोडसाम यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध विकास कामांचा आलेख सादर केला.कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, ज्येष्ठ नेते उद्धवराव येरमे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे, आर्णी किराणा एसोसिएशनचे भिकूभाई पटेल, विपीन राठोड, बाळासाहेब चावरे, विनीत माहुरे, काँग्रेसचे उद्धवराव भालेराव, भाजपाचे विशाल देशमुख, दीपक वानखेडे यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष उपस्थित होते. संचालन कैलास राऊत, तरा आभार विपीन राठोड यांनी मानले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर