शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

भूजल पातळी घसरली

By admin | Published: May 30, 2016 12:05 AM

अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे.

भूजल सर्वेक्षण : जिल्ह्यात सर्वाधिक घट कळंब तालुक्यामध्ये यवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे. कळंब तालुक्याच्या भूजल स्रोतात सर्वाधिक घट झाली आहे. मान्सून लांबल्यास स्थिती बिकट होण्याचा धोका भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्याचा भूभाग हा ब्लॅक बेसॉल्टपासून तयार झाला आहे. या दगडाचा गुणधर्म अधिक काळ पाणी साठवून ठेवणे हा मुळातच नाही. यामुळे पावसाळयात थोडा पाऊस आला तरी विहिरी ओढे दुथडी भरून वाहतात. उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी घसरते. यामुळे मुबलक पाऊस कोसळला तरी उन्हाळयात पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी अपुरा पाऊस पडल्याने पाण्याचे स्रोत वेळेपूर्वीच कोरडे पडण्याच्या प्रक्रि येला सुरूवात झाली. यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. १६ तालुक्यांतील ६४ वॉटरशेडमध्ये येणाऱ्या १७९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.४५ मीटरने घसरली आहे. सर्वेक्षण अहवालानुसार कळंब तालुक्यात सर्वाधिक ०.५८ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक भीषण स्थिती आहे. सर्वात कमी घट घाटंजी तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. या ठिकाणी ०.३२ मीटरने घसरण झाली आहे. (शहर वार्ताहर)भूजल पातळी घसरणे ही बाब चिंताजनक आहे. मात्र भविष्यात या स्थितीवर मात करण्यासाठी रिचार्ज शाप खोदले जात आहे. जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग असणार आहे.- राजेश सावळे, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक