शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

लोहारा विभागात गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 5:00 AM

दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष, सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नगरपरिषदेच्या लोहारा विभागात येणाऱ्या प्रभागांमध्ये गटारगंगा तयार झाल्या आहेत. या विभागात येणाºया जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. ही समस्या आता नागरिकांच्या जीवावर उठली आहे. सांडपाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव जीवघेणा ठरत आहे.दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाºया लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे. परंतु अगदी प्रवेशद्वारावरच भल्यामोठ्या खड्ड्यात सांडपाणी साचलेले आहे. यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. एकवीरा चौकात एका सदनिकेचे सांडपाणी सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावरून वाहते. तकलादू उपाय याठिकाणी केले जातात. विशेष म्हणजे या भागात सांडपाणी काढून देण्यासाठी मोठ्या नाल्या तयार झालेल्या आहेत. सांडपाणी त्याठिकाणी सोडण्यासाठी आवश्यक तो उपाय केला गेलेला नाही. याच मार्गावर तिरूपतीनगराकडे जाणाºया वळणावर सांडपाण्यात अक्षरश: पिण्याच्या पाण्याचा वॉल आहे. हा गंभीर प्रश्न सोडविण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही.लोहारा बायपासवर असलेल्या अहिल्यानगरी, राऊतनगर, मैथिलीनगर या भागातील गटारांना अक्षरश: तळ्याचे स्वरूप आलेले आहे. लोकांच्या अगदी घराला लागून सांडपाणी थोपले गेले आहे. वसाहती निर्माण होण्यापूर्वी पाणी वाहून जाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. नागरिकांनी वैयक्तिकरित्या शोषखड्डे तयार करून पाणी जागीच मुरविण्याचा केलेला प्रयत्नही फार काळ टिकलेला नाही. नगरपरिषदेकडून नाल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. दिला तरी अतिशय तोकडा असतो. दुसरीकडे गटार योजना येत असल्याने नाल्या बांधायच्या नाही, असे धोरणच असल्याचे सांगितले जाते. भूमिगत गटार योजना पूर्ण होईपर्यंत असाच त्रास सहन करायचा काय, हा नागरिकांचा प्रश्न आहे.वॉर्डाशी संबंधित काही नगरसेवकांना या समस्यांशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. समस्या मांडल्यानंतर कितीतरी दिवसपर्यंत दखल घेतली जात नाही. प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना लोकांचे प्रश्न सोडविले जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे.भूमिगत गटार योजना नाहीयवतमाळ शहरात राबविल्या जात असलेल्या भूमिगत गटार योजनेतूनही लोहारा विभागातील जवळपास प्रभागांना पहिल्या टप्प्यात स्थान मिळाले नाही. वास्तविक या भागात गटारांनी कहर केला आहे. दारव्हा रोडवर असलेल्या काही वसाहतींमधील सांडपाणी रेल्वे रुळाच्या बाजूला सोडून देण्यात आले आहे. प्रामुख्याने लोहारा बायपासवर असलेल्या वसाहतींमध्ये सांडपाण्याची समस्या मोठी आहे. मात्र याविषयी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. या भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी जवळच मोठा नाला आहे. त्यादृष्टीने इतर उपाययोजनांची गरज आहे.खड्डामय रस्तेनगरपरिषदेच्या लोहारा विभागात येणाºया अनेक भागात खड्डामय रस्त्यांची मालिका सुरू झाली आहे. तीन ते चार फुटांचा पसारा असलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. डागडुजी करण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. नगरसेवकही गंभीर नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषण