शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

बाभूळगावातील घारफळ, सरुळ परिसराला गारपिटीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 9:27 PM

गहू, हरभऱ्याचे नुकसान : सकाळपासून ढगाळी वातावरण

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ परिसराला शनिवारी सायंकाळी गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सकाळपासूनच परिसरात ढगाळी वातावरण होते. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच गारा बरसल्या. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ, परसोडी, शिंदी, पाचखेड, आष्टारामपूर, सौजना, एरंडगाव, वडगाव, मुबारकपूर, किन्ही, गोंधळी, गवंडी, महमदपूर आदी गावांना गारांनी झोडपले. शेतात गेलेले शेतकरी, शेतमजूरही यात सापडले.

खरीप हंगामात आलेली पिकांची तूट रब्बी हंगामात भरून निघावी म्हणून सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आदी पीक घेतले. ही पिके काढणीवर आलेली असतानाच परिसरातील काही गावांना गारपिटीचा तडाखा बसला. शेतशिवारातील उभी पिके वादळीवारा व गारपिटीने जमीनदोस्त झाली. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरुळ परिसरातही गारपीटीने शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान केले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला होता.

टॅग्स :Rainपाऊस