शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

अर्ध्या तासात ‘अ‍ॅन्सर-की’

By admin | Published: November 28, 2015 3:20 AM

जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील १९५ रिक्तपदासाठी जम्बो भरती प्रक्रिया घेतली जात आहे.

जिल्हा परिषद पदभरती : पुसद, आर्णीतही परीक्षा केंद्रयवतमाळ : जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील १९५ रिक्तपदासाठी जम्बो भरती प्रक्रिया घेतली जात आहे. लेखी परीक्षा संपताच अर्ध्यातासाच्या आत उमेदवारांना आॅनलाईन अ‍ॅन्सर की पाहता येणार आहे. प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवड समितीने ही सोय केली आहे. शिवाय यातील उत्तराबाब संभ्रम असल्यास २४ तासाच्या आत आक्षेप घेण्याची मुभा दिली आहे. विविध पदाच्या १५ संवर्गाच्या १९५ जागेसाठी एक लाखावर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेचे नियोजन करताना निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागत आहे. खुद्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतली. परीक्षा केंद्रावर महसूलातील उपजिल्हाधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिचर आणि कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज असल्याने यवतमाळ सोबतच पुसद, आर्णी येथेही परीक्षा केंद्र देण्यात येत आहे. यवतमाळात केवळ १२ हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची व्यवस्था आहे. परिचर पदासाठी १७ हजार तर ग्रामसेवकासाठी २० हजार उमेदवार आहेत. लेखी परीक्षेनंतर अ‍ॅन्सर की प्रसिध्द झाल्यानंतर २४ तासातच उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी पात्रतेच्या कागदपत्राची पडताळणी करून अंतीम यादी जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होऊनही नियुक्ती देण्यासाठी होणारी टाळाटाळ होणार नसल्याचे असे डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले. अंतीम यादीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)