शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

आरोग्य, शिक्षणावर सर्वाधिक भर

By admin | Published: January 12, 2017 12:49 AM

नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या

नगराध्यक्ष अर्चना मंगाम करणार शहराचा कायापालट नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी ‘लोकमत’शी चर्चा केली. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जाईल. शहराच्या काही भागामध्ये पथदिवे नाहीत. पुढील काही दिवसात प्रत्येक चौक आणि परिसर पथदिव्यांमुळे उजळून निघेल, असा विश्वास त्यांनी दिला. महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाईल. प्रत्येक चौकात महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उभारण्यात येईल. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होते. काहीप्रसंगी अपघातही होतात, त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त केला जाईल. नगरपरिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. शिक्षकाची पत्नी असल्याने ती आपली पहिली जबाबदारी असेल, असे त्या म्हणाल्या. पालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जाईल. सत्ताधारी, विरोधक आणि जनतेच्या सहकार्याने शहराचा विकास केला जाईल. प्रत्येक समस्या मार्गी लावून शहराचा कायापालट करण्यात येईल, असे नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य - उपाध्यक्ष राजीव वीरखेडे आर्णी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजीव वीरखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि अग्निशमन दलाचे वाहन शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून घेतले जाईल. शहरातील आठवडी बाजार आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला बसून व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. गरजूंना शासकीय नियमानुसार घरकूल देण्यात येईल. शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाईल. उद्यानाची निर्मिती करण्यात येईल. आवश्यक त्या ठिकाणी प्रसाधनगृह उभारले जाईल. पालिकेतील पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहर विकास साधला जाईल.