शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; घोषणा कोट्यवधींच्या निधीची अन् मदत तुटपुंजी

By रूपेश उत्तरवार | Published: November 02, 2022 3:51 PM

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

यवतमाळ : राज्यभरात अतिवृष्टीने २३ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. या स्थितीत मदतीचा हात म्हणून राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांच्या नैसर्गिक आपत्ती निधीची घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काही हजार रुपयेच पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमा अधिकच मोठ्या झाल्या आहेत. नुकसानभरपाई निघेल कशी? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

राज्यातील २३ लाख हेक्टरपैकी दहा लाख हेक्टर क्षेत्र विदर्भातील आहे. त्यात पाच लाख हेक्टर क्षेत्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी पावणेपाच लाख शेतकऱ्यांना मदतीसाठी ६४३ कोटी वळते झाले आहेत. किमान एका शेतकऱ्याला ४० हजार रुपये मिळतील, अशा स्वरूपाचे चित्र सरकारकडून रंगविण्यात आले. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत हातात पडली. यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

प्रारंभी तलाठी, पटवारी आणि कृषी सहायकांनी याद्या तयार करताना विलंब लावला. यानंतर बँकांची आडकाठी आली. दिवाळीनंतर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या अनेक गावांमध्ये लागलेल्या नाहीत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत निधी देताना त्यांच्या खात्यावर पाच हजार, सात हजार, नऊ हजार, १२ हजार अशी रक्कम गोळा झाली आहे. वास्तविक पाहता, प्रत्येक शेतकऱ्याला लाख रुपयांच्या वर फटका बसला. हातात पडलेल्या रकमेत शेतातील मोठे गवतही काढणे अवघड आहे.

दुपटीने निधी वाढविला, मदत मात्र घटविली

राज्य शासनाने हेक्टरी मर्यादा ६८०० वरून १३ हजार ६०० केली आहे. मात्र, नुकसानीचे सर्वेक्षण करताना यंत्रणेकडून शेतकऱ्यांना ३० टक्के, ४० टक्के, ६० टक्के, ७० टक्के यानुसार घोषित मदतीच्या रक्कम मिळाली आहे. ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजारांपासून ते २५-३० हजारांपर्यंत आहे. मदतीचा आकडा पाच अंकी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. यामुळे झालेली नुकसान भरपाईही भरून निघणार नाही, अशी स्थिती आहे.

सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. आमच्या शेतात लाख रुपयांपेक्षाही अधिक नुकसान आहे. प्रत्यक्षात चार हजार रुपयांची मदत खात्यात जमा झाली आहे.

- हरीश लढ्ढा, शेतकरी, बोरीअरब

आमच्या शेतात नैसर्गिक आपत्तीसोबतच रानडुकरांनी देखील आठ एकरचे पीक भुईसपाट केले आहे. अशा परिस्थितीत घर कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाची ही मदत ताेकडी आहे.

- राजेश तिवाडी, शेतकरी, उजोणा

माझ्या शेतात आजही चालता येत नाही इतका चिखल आहे. या परिस्थितीत मला नुकसानभरपाई १२ हजार मिळाली आहे. या पैशात काय होणार? या ठिकाणी माझे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

- अनुप चव्हाण, शेतकरी, बोथबोडन

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी