शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

अतिवृष्टीचा 829 गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 5:00 AM

गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील  १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, महागाव पाच हजार ४७० हेक्टर, पांढरकवडा २१ हजार २२५ हेक्टर, वणी २८ हजार ७६० हेक्टर, मारेगाव १७ हजार ३१६ हेक्टर तर झरी तालुक्यात १७ हजार २८२ हेक्टरला फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सलग सात दिवस बरसलेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना झोडपून काढले. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने शेतशिवारात शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. या नैसर्गिक प्रकोपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दीड लाख पेक्षाही अधिक क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या नैसर्गिक हानीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ ते १४ जुलैपर्यंत मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. हे नुकसान भरून न निघणारे असेच आहे. यवतमाळ जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. कमी वेळात अधिक पाऊस बरसल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरात गाळ वाहून आल्याने उभे असलेेले पीक भूईसपाट झाले. याठिकाणी आता पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. पेरणीचा कालावधी संपल्याने कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील  १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, महागाव पाच हजार ४७० हेक्टर, पांढरकवडा २१ हजार २२५ हेक्टर, वणी २८ हजार ७६० हेक्टर, मारेगाव १७ हजार ३१६ हेक्टर तर झरी तालुक्यात १७ हजार २८२ हेक्टरला फटका बसला. यामध्ये कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ७२ हजार ३१७ हेक्टरला याचा फटका बसला आहे. तर ३९ हजार १७३ हेक्टरवरील सोयाबीनचे पीक भुईसपाट झाले आहे. १० हजार २८६ हेक्टरवरील तूर जळून गेली आहे. 

भाजीपाला आणि फळपिकांना फटका- १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला कचऱ्याप्रमाणे फेकून द्यावा लागला. सततच्या पावसाने फळपिकांची फुलगळ झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाने रेकाॅर्ड मोडला - जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्याचा पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला आहे. हा पाऊस क्षमतेपेक्षा अधिक असल्याने पिकांच्या वाढीला फटका बसेल. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती