शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

रक्तफुलांनी सजल्या रानवाटा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 10:15 PM

वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते.

ठळक मुद्देवसंतातला बहर : केशरी रंगछटांनी उजळले शिवार, दऱ्याखोऱ्यात फुलण्याचा उत्सव

संतोष कुंडकर।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते. ईकडे पळस वृक्षे वसंतोत्सवासाठी फुलारून येतात. बहर वेगाने वाढतो अन् अवघ्या वनराईतील रानवाटा रक्तफुलांच्या केशरी रंगछटांनी उजळून निघतात.गुजरातीत खाकेरा, संस्कृतमध्ये पलाश, त्रिपत्रक, रक्तपुष्पक तर इंग्रजी भाषेत फ्लेम आॅफ द फॉरेस्ट अशा विविध नावांनी ओळखला जाणारा मराठी भाषेतील पळस सध्या रानावनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पिवळ्या आणि केशरी अशा दोन रंगात उमलणारी पळसाची फुलं तशी सर्वांच्याच जिव्हाळ्याची. रंगपंचमी आली की, जुन्या पिढीला पळसफुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी रंगपंचमीला पळसफुलांचाच रंग उधळला जात असे. उन्हाळ्याच्या सुरूवातीला म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरूवातीला पळसवृक्ष पानांचे नवे आवरण पांघरतो, तर वसंत पंचमीला तो फुलांनी सजतो. मिश्र मोसमी जंगलात अस्तित्व दाखविणारा पळस राज्यभर दृष्टीपथास पडतो. दूर डोंगरदऱ्यावर नजर फिरविली की, पेटणारी ज्योत जशी हवेमुळे लहानमोठी होताना दिसते, तशीच ही पळसफुलं दिसायला लागतात. म्हणूनच ब्रिटीश राजवटीतील गोऱ्या साहेबांनी या फुलांना ‘फ्लेम आॅफ द फॉरेस्ट’ असे नाव दिले असावे. रानात असा उमलण्याचा उत्सव सुरू असताना पळसफुलांपाठोपाठ पांगारा, आंबा, काटसावरीची झाडंही फुलांवर येतात.हिवाळा संपला की, जंगलातील पानवठे आटायला सुरूवात होते. उन्हाचा तडाखा वाढतो. ही रानफुलं मग जंगलातील व्याकूळ पाखरांना तहानभूक भागविण्यासाठी स्वत:तील द्रव पुरवितात आणि म्हणूनच तापत्या उन्हात या फुलारलेल्या झाडांवर मैना, पोपट, बुलबुल, नाचरा, कोतवाल, दयाळ असे अनेक पक्षी आणि मधमाश्या, मुंग्या यांची जत्राच भरते. एक जीव (पळसफुलं) दुसऱ्या जीवाला जीवनरस वाटत आहे, असे मनोहारी दृष्य रानावनात पहायला मिळते.बहुउपयोगी पळसाची होतेय निर्दयपणे कत्तलपळसाची आंतरसाल महिलांच्या विविध आजारावर रामबाण समजली जाते. पळसफुलांचा काढा किंवा रस तापशमक आहे. उन्हाळीच्या विकारावर तो उपयुक्त ठरतो. पळसाच्या बिया (पळसपापडी) कृमीनाशक व विरेचक म्हणून वापरल्या जातात. मात्र जलतन व होळीच्या नावावर पळसाची कत्तल होते.