शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

नेर, यवतमाळला झोडपले; निळोणा तुडुंब, बेंबळाचेही दरवाजे उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:42 PM

नेरमध्ये १०९ तर यवतमाळ तालुक्यात ६३ मिमी पाऊस : बाभूळगावसह कळंब, दारव्हा तालुक्यातही जोर

यवतमाळ : महिनाभराच्या विलंबाने जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले, तरी मागील काही दिवसांत पावसाने दमदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठा वाढत आहे. निळोणा धरण भरल्यानंतर आता बेंबळा प्रकल्पातही पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी (दि. १३) सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान, यवतमाळसह नेर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून नेरमध्ये अतिवृष्टी झाली असून, तेथे १०० मिमी पाऊस कोसळला आहे. जून महिन्यात पावसाने निराशा केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाने जोर धरल्याने बळीराजा पेरणीला लागला आहे.

जिल्ह्यातील साधारण: ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या आहेत. मंगळवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. विशेषत: संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. अनेक भागांत रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १०० मिमी पाऊस नेर तालुक्यात झाला असून, त्यापाठोपाठ ६३.५ मिमी पावसाची नोंद यवतमाळ तालुक्यात झाली आहे. बाभूळगाव, कळंब, दारव्हासह मारेगाव तालुक्यातही दमदार पाऊस झाला.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. बुधवारप्रमाणेच गुरुवारी, तसेच शुक्रवारीही जिल्ह्यात पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे बेंबळा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन वक्र दरवाजे उघडून २५ सेमी इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, वणीसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाने निकृष्ट रस्त्याचे पितळ पाडले उघडे

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यातही मागील दोन-तीन दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत ३३३.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली असून, एकूण पावसाच्या ती २४.६ टक्के इतकी आहे; मात्र या पावसात यवतमाळसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सोसावा लागत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ