शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कास्ट व्हॅलिडिटी अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘मानवतावादी दृष्टिकोन’

By अविनाश साबापुरे | Updated: May 9, 2024 21:00 IST

सीईओंचे निर्देश : सेवा सुरूच राहणार, मात्र वार्षिक वेतनवाढ नाही

यवतमाळ : अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नोकरीत लागलेले मात्र आता कास्ट व्हॅलिडिटीच नसलेले कर्मचारी ११ महिन्यांसाठी अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. परंतु, आता जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा मानवतावादी दृष्टिकोन दाखवित त्यांना ‘कन्टीन्यू’ करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्यांना वार्षिक वेतनवाढ देऊ नये, असे निर्देश विभाग प्रमुखांना गुरुवारी देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक कर्मचारी एसटी प्रवर्गातून लागलेले असताना त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र मात्र अवैध ठरले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व त्यानंतर आलेल्या शासन निर्णयानुसार त्यांना शासकीय सेवेत न ठेवता अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले. परंतु, त्यांची ही अधिसंख्य सेवा केवळ ११ महिन्यांसाठी होती. शासनाने त्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली आहे. परंतु, आता या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीविषयक लाभाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

त्यानुसार या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळेल, परंतु पदोन्नती व अनुकंपा धोरणाचा लाभ मिळणार नाही. अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीसाठी सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत त्यांच्या सेवा सुरू ठेवल्या जाणार आहेत. ११ महिन्यांच्या सेवेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे त्यांना वार्षिक वेतनवाढ तसेच इतर सेवाविषयक लाभ अनुज्ञेय ठरत नाही. तसेच अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वीची सेवा ही सेवानिवृत्तीविषयक लाभांसाठी अहर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. 

‘त्या’ कर्मचाऱ्यांकडून होणार वसुलीशासन निर्णयानुसार २१ डिसेंबर २०१९ नंतर ज्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे, त्यांना वेतनवाढ देता येत नाही. परंतु, जिल्हा परिषदेतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली गेली असल्यास ती रद्द करण्याचे निर्देश सीईओंनी दिले आहेत. तसेच वेतनवाढीमुळे देय ठरलेली रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचेही सर्व विभागप्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत.

कोणत्या विभागात किती अधिसंख्य कर्मचारी- शिक्षण : ४५- बांधकाम : ०८- पशु संवर्धन : ०२- पंचायत : ०१- वित्त ०१- आरोग्य ०५- सामान्य प्रशासन ०२

टॅग्स :Yavatmalयवतमाळ