शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

अबब ! यवतमाळ जिल्ह्यातील १६ गावे खातात दीड कोटींचे खर्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:07 AM

यवतमाळ तालुक्यातील १६ गावांनी वर्षभरात चक्क दीड कोटी रुपयांचे खर्रे पचविल्याची बाब या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून पुढे आली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातील वास्तवबालपंचायतीने केला व्यसनी पालक, पानठेल्यांचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागात जशी गरिबी मोठ्या प्रमाणात आहे, तसेच तंबाखू खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड आहे. दैनंदिन गरजा भागवू न शकणारी माणसे व्यसनात मात्र कोट्यवधी रुपये उधळत असल्याचे विदारक वास्तव बालपंचायतीच्या विद्यार्थ्यांनी पुढे आणले आहे. तालुक्यातील १६ गावांनी वर्षभरात चक्क दीड कोटी रुपयांचे खर्रे पचविल्याची बाब या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून पुढे आली.जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठाण तसेच टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले. मंगळवारी या सर्वेक्षणातील तथ्य पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. १७ ते २३ जानेवारीपर्र्यंत सुकळी, येळाबारा पोड, धानोरा, गणेशपूर, आकपुरी, चौकी आकपुरी, चौकी झुली, वडगाव, वरुड, वरझडी, येवती, हातगाव, कारेगाव, यावली, मुरझडी, रामनगर या १६ गावांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण व युवा कौशल्य विकास या उपक्रमाचा भाग म्हणून या १६ गावांमध्ये विद्यार्थ्यांची बालपंचायत स्थापन करण्यात आली आहे. याच विद्यार्थ्यांनी सर्वे केला.

अशी झाली सुरूवातसर्वे करताना मुलांना गावात सर्वत्र खऱ्याच्या प्लास्टिक पन्न्या आढळल्या. रोज अशा किती पन्न्या गावात फेकल्या जातात, असा विचार त्यांनी केला. तितक्या खऱ्यावर आपल्या पालकांचा, गावकऱ्यांचा खर्च होत असणार, ही बाब त्यांनी हेरली. आपण पालकांना पेन, वहीसाठी पैसे मागितले तर ते देत नाही. म्हणूनच व्यसनावर होणारा अनाठायी खर्च पालकांच्या लक्षात आणून दिला पाहिजे, असा विचार मुलांनी केला. समन्वयक सुनिल भेले यांच्या मार्गदर्शनात तालुका समन्वयक, क्षेत्रीय समन्वयक, गाव समन्वयक व बालपंचायतीच्या मुलांनी गावपातळीवर सर्वेचे नियोजन केले.

असा झाला सर्वेसमन्वयक सुनिल भेले यांच्यासह बालपंचायतीचे विद्यार्थी कल्याणी ढग (वरुड), यश बलकी (हातगाव), श्रद्धा गुंजकर (सुकळी) यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण सर्वेक्षणाचा तपशील सादर केला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत दर दोन तासांनी गावात किती खर्रे विकले जातात याची माहिती मुलांनी घेतली. त्यासाठी गावातील रस्त्यांचा नकाशा काढून पानठेले कुठे कुठे आहे हे निश्चित केले. पानठेला चालकांना विचारून दिवसभरातील खर्रा विक्रीची माहिती घेतली गेली. त्यासोबतच दिवसभरात रस्त्यावर फेकण्यात आलेल्या खऱ्याच्या पन्न्याही उचलून मोजण्यात आल्या.या सर्वेत एकूण २१० मुले सहभागी झाली होती. १६ गावांमध्ये २२ हजार १३ पन्न्या मुलांनी वेचल्या. या गावांमध्ये दिवसाला ४ हजार ५९३ खर्रे खालले जातात, असे आढळले. याचा दिवसाचा खर्च ४६ हजार ३३२ रुपये होतो. तर महिन्याला १३ लाख ९८ हजार ८६० आणि वर्षाला १६ गावांचा खर्च १ कोटी ४३ लाख २४ हजार ५२० एवढा प्रचंड होतो, असे स्पष्ट झाले. ही माहिती सोळाही गावातील सूचना फलकावर लिहिण्यात आली आहे.मी खर्रा आणून देणार नाही..!खेड्यांमध्ये लहान मुलांना खर्रा आणण्यासाठी पानठेल्यांवर पाठविताना आजही पालकांना गैर वाटत नाही. मात्र, बालपंचायतीने सर्वे करताना त्यावर तोडगा शोधला. प्रजासत्ताक दिनी या सोळाही गावांतील मुलांनी ‘यापुढे मी खर्रा आणून देणार नाही’ अशी शपथ घेतली. पालकसभेपुढे याबाबत माहिती दिली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य