शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
2
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
3
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
4
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
5
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
6
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
7
गँगवॉर, मर्डर, एन्काउंटर : सावधान मुंबई बदलत आहे
8
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला
9
Harmanpreet Kaur एकटी लढली; पण शेवटी तिची एक चूक नडली!
10
मुंबई-हावडा मेल टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव स्थानकावर २ तास तपासणी!
11
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
12
Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा
13
“भाजपातून ८० टक्के लोक आमच्याकडे”; शरद पवारांच्या विधानावर महायुतीतील मंत्र्यांचा पलटवार
14
गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
15
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले
16
काय आहे PM Internship Scheme? Reliance सह 'या' बड्या कंपन्यांमध्ये 'इंटर्न' होता येणार!
17
रामलीला ऐन रंगात आलेली! तेवढ्यात 'राम व रावण' खरोखरच एकमेकांना भिडले, लाथाबुक्क्या घालू लागले
18
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
19
सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?
20
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भक्तांसाठी अहोरात्र झटतात शेकडो हात

By admin | Published: October 16, 2015 2:23 AM

यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात.

यवतमाळ : यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात. यातील बरेच भक्त अनवाणी असतात. तर अनेकांचा निरंकाळ उपवास असतो. काही भक्त देवीच्या दर्शनानंतरच उपवास सोडतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी दुर्गोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच दररोज शेकडो हात अखंड झटताहेत. काही मंडळे अन्नदान करीत आहेत. काही भक्तगण उपवासाच्या साहित्याचे वितरण करीत आहे. अनेक भक्त मंडळांनी दुधाचे वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यातून अन्नदानाचा अखंड यज्ञ सुरू आहे. यावर्षीच्या दुर्गोत्सवाचे विशेष वैशिष्ट आहे. प्रत्येक मंडळाने भक्तांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली आहे. शहरातील कुठल्याही भागात पोहोचले तरी अहोरात्र अन्नदान करण्यात येत आहे. जिल्हाभरातच दुर्गोत्सवातील हे दानधर्म मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कित्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पदरमोड करून त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्नदान, दूधवाटप केले जात आहे. यानिमित्ताने गावखेड्यातील भाविकांना देवीचा महाप्रसाद मिळत आहे. भोळ््याभाबड्या भाविकांच्या चेहऱ्यावर त्याचे वेगळे समाधानही झळकत आहे. जिल्ह्याच्या १६ ही तालुक्यात यवतमाळ प्रमाणेच दुर्गोत्सवाचा प्रचंड उत्साह असतो. त्यातल्या दानधर्मालाही वेगळे महत्व आहे. यवतमाळच्या गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाने भक्तांचा निरंकाळ उपवास लक्षात घेत दूध वितरणाची आपली अखंड परंपरा जपली आहे. यासाठी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. दुधाला तापविण्यासाठी सकाळपासूनच प्रक्रिया केली जाते. दूध वितरणासाठी १० हजार ग्लास बोलविण्यात आले आहेत.शहरातील माळीपुरा परिसरात असलेल्या नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ४४ वे वर्ष आहे. या मंडळाने गत १५ वर्षांपासून अन्नदानाचे कार्य हाती घेतले आहे. सर्वाधिक अन्नदान करणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. या ठिकाणी दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. यासाठी १६ तास काम चालते. भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये कारागीर अखंडपणे काम करीत असतात. या ठिकाणी दररोज १५ भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यासाठी दररोज सहा क्विंटल कणिक लागते. एक क्विंटलची जिलेबी, पाच क्विंटल तांदूळ, सात क्विंटल भाजी, ५०० लिटर दूध दररोज लागत आहे. यासाठी ५० स्वयंपाकी अहोरात्र झटत आहे. यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी काम करीत आहेत. बालाजी चौकातील बालाजी चौक दुर्गोेत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या मंडळाने अखंड अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे. या ठिकाणी सरासरी पाच हजारांवर भाविकांसाठी अन्नदान करण्यात येते. दररोज चार क्विंटल गहू, १ क्विंटल तांदूळ, अडीच क्विंटलची भाजी आणि गोड पदार्थ रोज भोजनात असतात. या ठिकाणी अन्नदानासाठी सरासरी २५ सेवेकरी अहोरात्र झटत आहेत. आठवडी बाजारातील हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाचे ७७ वे वर्ष आहे. शहरातील भाविक महिला मध्यरात्रीपासून शितला मातेला जल अर्पण करतात. रात्रभर या भागात वर्दळ सुरू असते. दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांसाठी दूध आणि उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे. साधारणत: ५०० लिटर दूध वितरित करण्यात येते. छोटी गुजरी चौकातील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४६ वे वर्ष आहे. या मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताकरिता उपवास साहित्य वितरित करण्याचे काम हाती घेतले आहे. नऊ दिवस या ठिकाणी उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे. आर्णी नाक्यावरील जय माता दी मित्र परिवार मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या मंडळासाठी दूध वितरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. परिसरातील व्यापाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती राजू बंडेवार, सुनिल अग्रवाल, अतुल मुक्कावार आदींनी दिली. (शहर वार्ताहर)