शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अवनीच्या शिकारीसाठी महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्रच ठरले उपयोगी! बछड्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 12:31 IST

१३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली.

- नरेश मानकरपांढरकवडा (यवतमाळ)  - १३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. नागपूरच्या महाराज बागेतून दुस-या वाघिणीचे मूत्र आणून जंगलात शिंपडले. कशालाच दाद न देणारी अवनी निसर्गनियमानुसार त्या वासावर आली आणि शार्पशुटरनी तिचा वेध घेतला.नरभक्षक झालेल्या अवनीला जेरबंद करण्याची मोहिम युद्धस्तरावर सुरू होती. मध्यप्रदेशातून हत्ती आणले, प्रसिद्ध शार्पशुटर बोलविण्यात आले. हवाई शोध घेण्यासाठी पॅराग्लाईडर आणण्यात आले. इटालीयन कुत्रेसुद्धा आणण्यात आले होते. शेवटी वाघिणीचे मूत्रच उपयोगी ठरले. मुत्राच्या वासामुळे कधीकधी ती झुडूपाबाहेर येत होती. कॅमेरामध्येही ती ट्रॅप झाली. तिच्या पाऊलखुणाही आढळून आल्या होत्या. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास वाघीण बोराटी जंगल परिसरात दुस-या वाघिणीच्या मूत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली आणि शार्पशुटर असगर अली खान याने नेम धरून गोळी झाडली व ती धारातीर्थी पडली. पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा यांना भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती देण्यात आली. पहाटे ४.३० वाजेपर्यंत तब्बल पाच तास पंचनामा करून मृतदेह नागपूर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.वाघिणीला बेशुद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. परंतु ती चवताळून पथकावर चाल करून आली. त्यामुळे तिला ठार केल्याशिवाय पर्याय नव्हता, असे पांढरकवडा विभागाचे उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा यांनी सांगितले.बेशुद्धीचा प्रयत्न झालाच नाहीवाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला की नाही, की तिच्यावर सरळ गोळ्याच घालून ठार मारण्यात आले, याबाबत संभ्रम आहे.वाघिणीच्या मृत शरिरात बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेला डार्ट आढळून आला. परंतु तो मृत झाल्यावर तिच्या शरिरात खुपसण्यात आल्याचा दावा वन्यजीव प्रेमींनी केला आहे.तब्बल दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर ठार मारण्यात आलेल्या नरभक्षक वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाही. त्यांना कसे जेरबंद करायचे हा गहन प्रश्न आता वनविभागासमोर निर्माण झाला आहे.आई दिसली नाही, तर हे बछडे अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त असून त्यातून पुन्हा मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रTigerवाघ