शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

रेबिजचं इंजेक्शन घेतलंय, तर मग करू नका वर्षभर रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 6:35 PM

पुढचा धोका टळेल : दुर्धर आजार असणाऱ्यांनीही टाळावे रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेकजण अजानतेपणी आपण स्वतः एखाद्या आजाराने ग्रस्त असतानाही किंवा आजाराबाबत औषधी सुरू असतानाही थेट रक्तदानासाठी जातात. याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर होण्याचा धोका असतो. ज्यांना कुत्रा चावला व त्यांनी रेबिजचे इंजेक्शन घेतले अशांनी वर्षभर रक्तदान करू नये. जेणेकरून पुढचा धोका होणार नाही.

काहीजण उत्साहाच्या भरात आपले आजार सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती रक्तदान करताना सांगण्याचे टाळतात. मात्र अशा व्यक्तीने रक्तदान केल्यास त्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने रक्तदान केल्यास हायपोग्लायसिमिया होण्याची भीती आहे. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कायम प्रतिबंध करण्यात आला आहे, तर रेबिज व इतर कुठल्या लसी घेतलेल्या व्यक्तीने किमान वर्षभर रक्तदान करू नये. जेणेकरून शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही. जी व्यक्ती धडधाकट आहे. तिला कुठलाही आजार नाही, औषधी सुरू नाही अशा व्यक्तीने आवर्जून रक्तदान करावे. त्यांना आणखी चांगले आरोग्य मिळते, शिवाय गरजूंना रक्त देऊन त्यांची मदत केल्याचे समाधान लाभते.

रक्तदान करताना उत्तम आरोग्य महत्त्वाचेरक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताच्या एका बॅगपासून तीन रक्त घटक तयार होतात. सोबतच रक्तदान केल्याने नवीन पेशी तयार होते. हृदयरोग, रक्तदाब या आजारांची शक्यताही रक्तदात्यासाठी कमी होत जाते.

रक्तदान करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या 

  • तीन दिवस अगोदर प्रतिजैविकं घेतलेली नकोत 
  • गत तीन महिन्यांत मलेरिया झालेला नको
  • वर्षभरात कावीळ, विषमज्वर झालेला नको
  • रिक्रिएशनल, अंमली पदार्थांचे सेवन नको
  • गत वर्षभरात श्वानदेश झालेला नको
  • गत वर्षभरात रेबीजची लस घेतलेली नको
  • रक्तदान करण्याआधी १५ दिवस आधी, कॉलरा, टायफाइड, प्लेगची लस घेतलेली असायला नको

या व्यक्तींना करता नाही येत रक्तदान ज्यांना सिकलसेल ब्लड कॅन्सर, एचआयव्ही, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असे आजार आहेत, त्या व्यक्तींनी रक्तदान करू नये, असे केल्यास त्याचा दुष्परिणाम रक्तदात्यावरच होण्याची शक्यता अधिक आहे.

१८ ते ६० वर्षे स्वेच्छेने करू शकाल रक्तदान

  • शारीरिक तंदुरुस्ती असणाऱ्यांनी वर्षातून तिनदा आवर्जून रक्तदान करावे. याचा फायदा स्वतःच्या शरीरावरही होतो.
  • रक्तदान केल्याने रुग्णाला जीवनदान दिल्याचे समाधान मिळते. त्यामुळे रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान असल्याचे मानले जात आहे.

एचबी किमान १२.५; वजन हवे ४५ किलोच्या पुढेरवत्तदान करण्यासाठी काही पात्रता ठरविण्यात आल्या आहेत. दात्याच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ असणे आवश्यक आहे, तसेच या व्यक्तीचे वजनही किमान ४५ किलोच्या पुढे असेल, तरच रक्तदान करता येते. रक्तदान केल्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे तरुणांनी पुढे यायला हवे.

गर्भवतींना रक्तदान करता येते का?गर्भवती महिलांनी कुठल्याही परिस्थितीत रक्तदान करू नये. गर्भाची वाढ होत असताना, महिलांच्या शरीरातच पुरेशा रक्ताची गरज भासते. अशात रक्तदान केल्यामुळे गर्भावर परिणाम होऊ शकतो.

दर चार महिन्यांनी करता येईल रक्तदानएकदा रक्तदान केल्यानंतर किमान चार महिने रक्तदान करणे टाळावे. या कालावधीत शरीरात रक्ताचे प्रमाण संतुलित होते. चार महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करणे सुरक्षित ठरते.

"रक्तदान करून आपण थेट जीवनदान करण्याचे काम करतो. रक्त पिशवीतून तीन घटक वेगळे केले जातात. त्यामुळे एका दात्याच्या रक्तापासून तीन रुग्णांना रक्ताचा लाभ होतो. प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे."- डॉ. विशाल नरोटे, सहायक प्राध्यापक. 

टॅग्स :YavatmalयवतमाळBlood Bankरक्तपेढी