शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

दाभडीला जोडणारा पूल दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 9:55 PM

तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता.

ठळक मुद्दे‘चाय पे चर्चा’ कोरडी : ग्रामस्थ, भाविकांना होतोय नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता.दाभडी शिवार आणि ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या हा रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच रस्त्यावर हा पूल आहे. मात्र गेलया तीन वर्षांपासून तो तुटलेल्या अवस्थेत आहे. पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल जिवघेणा ठरत आहे. याच जिवघेण्या पुलावरून सध्या नागरिकांना जाणे-येणे करावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थ तथा भाविक घाबरलेले आहे.या पुलाच्या दुरुस्तीबाबत कुणीच पुढाकार घेत नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहे. याच गावात चार वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे हे गाव देशाच्या नकाशावर झळकले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या गावाला दत्तक घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निकषात बसत नसल्याने ते शक्य झाले नाही. तथापि गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, निदी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ना.अहीर यांनी मुख्यमंत्र्यांनी दाभडी गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणाही फोल ठरली.आमदार राजू तोडसाम यांनी दाभडीत विकास कामे मंजूर केली. मात्र ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ याच पद्धतीने काम सुरु आहे. गावाला, मंदिराला जोडणारा पूल महत्वाचा असताना अद्याप त्याची दुरुस्ती झाली नाही. उलट गावातील रस्ते मंजूर झाले. यामुळे ग्रामस्थ आणि भाविक वैतागून गेले आहे.हा पूल महत्वाचा आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना त्वरित पुलाच्या दुरूस्तीचे ईस्टीमेट बनवून प्रस्ताव पाठवायला सांगितले. लवकरच दुरूस्ती केली जाईल.- आमदार राजू तोडसाम

टॅग्स :Yavatmalयवतमाळ