शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच रेतीची अवैध लूट, लाखोंच्या महसुलावर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:33 AM

एकही घाट सुरू नसताना यवतमाळमध्ये २४६ बांधकामे सुरू

यवतमाळ : साधारण वर्षभरापासून जिल्ह्यात अधिकृतपणे एकही रेतीघाट सुरू नाही. मात्र, त्यानंतरही यवतमाळ शहरासह जिल्हाभरात धूमधडाक्यात बांधकामे सुरू आहेत. एकट्या यवतमाळ शहरात मागील तीन महिन्यांत तब्बल २४६ बांधकामांना खुद्द नगर परिषदेनेच परवानगी दिलेली असल्याने या बांधकामासाठी लाखो रुपयांची वाळू येते कुठून, असा सवाल सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे. महसूल आणि खनिकर्मच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच रेतीची ही अवैध लूट सुरू असल्याचीही चर्चा आहे.

२०२१-२२ या वर्षामध्ये जिल्ह्यात रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली होती. जिल्ह्यातील १४ रेतीघाटांचा लिलाव होऊन या माध्यमातून तब्बल १७ कोटी ७१ लाखांचा महसूल शासनाला प्राप्त झाला होता. दरम्यानच्या काळात १९ एप्रिल २०२३ रोजी शासनाने प्रशासनामार्फत रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्री करण्याबाबतचे नवे धोरण जाहीर केले. तेव्हापासून जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही.

जिल्ह्यात तब्बल २०० रेतीघाट आहेत. त्यापैकी साधारणपणे ३० घाट रेतीउपसा करण्यासाठी पात्र होतात. याच रेतीघाटांच्या माध्यमातून शासनालाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, लिलावाची प्रक्रियाच थांबल्याने वर्षभरापासून शासनाचा महसूल बुडाला आहे. रेतीघाटाची नव्या धोरणानुसार प्रक्रिया पूर्ण पार पडेपर्यंत या घाटांवर नजर ठेवण्याचे निर्देश तहसीलदारांसह तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, या घाटातून महसूल तसेच खनिकर्मच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेतीची अवैध लूट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा आहे.

एकट्या यवतमाळ शहराचा विचार केला असता १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल २४६ बांधकामांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. यातील बहुतांश कामे सुरू आहेत. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही रेतीघाट सुरू नसताना या बांधकामासाठी रेती मिळते कुठून, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, अवैध रेतीवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेला महसूल विभागही ठोस कारवाई करीत नसल्याने रेतीची जिल्हाभरात खुलेआमपणे लूट केली जात आहे.

जिल्हाधिकारी ठोस कारवाई करणार का?

जिल्ह्यातील घाटांतून विनापरवाना रेतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. महसूल विभागाकडून काही ठिकाणी किरकोळ कारवाया होत असल्या तरी जिल्ह्यातील सुरू असलेल्या बांधकामाची आकडेवारी पाहिली असता महसूल तसेच खनिकर्ममधील अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच रेतीची लूट केली जात असल्याची उघड चर्चा आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे या प्रकरणात तहसीलदारांसह महसूल अधिकाऱ्यांना जाब विचारून ठोस कारवाई करणार का, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीYavatmalयवतमाळGovernmentसरकार