शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

२७९ गावांत उघड्यावर करावे लागते अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 6:01 PM

Yavatmal : स्मशानशेडच्या बांधकामासाठी जागाही मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना जिल्ह्यातील २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. अंत्यसंस्कारासाठी जागाही मिळत नाही. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार कुठे करावा, असा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा राहतो. स्मशानभूमीअभावी २७९ गावातील लोकांना मरणाची भीती वाटते. धार्मिक रितिरीवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार नसेल होत तर मोक्ष कसा मिळणार, हादेखील एक प्रश्नच आहे.

जिल्ह्यात १ हजार ८३१ महसुली गावे आहेत. एकूण ग्रामपंचायतींची संख्या १ हजार २०० आहे. ७०७ स्वतंत्र ग्रामपंचायती असून, ४९३ गट ग्रामपंचायती आहेत. यात २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आणि झरीजामणी या तालुक्यांतील गावात स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात हातात छत्री पकडून अंतिम संस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर येते. जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येते. काही गावांत जागेची अडचण आहे. तर, वनविभागाच्या हद्दीत असलेली जागा मिळत नाही. यामुळे स्मशानभूमी शेड बांधकामाला अडथळा येत असल्याचे सांगितले जाते. अडचण सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्यात किती गावांत नाही स्मशानभूमी? तालुका                               स्मशानभूमी नसलेली गावे आर्णी                                              १६बाभूळगाव                                      ०९दारव्हा                                            १४दिग्रस                                              १०घाटंजी                                             २९कळंब                                             ०७केळापूर                                           १२महागाव                                           २६मारेगाव                                           १९नेर                                                  १२पुसद                                               १४राळेगाव                                          १३उमरखेड                                         १९वणी                                                ३२यवतमाळ                                       ०९झरी                                                ३८

२७९ उपलब्ध नाही गावांत स्मशानभूमीच■ जिल्ह्यातील २७९ गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नातेवाइकांना उन्हाळा व पावसाळ्ळ्यात त्रासाचा सामना करावा लागतो. झरी तालुक्यातील तब्बल ३८ गावांत स्मशानभूमीचा अभाव आहे.■ सोबतच घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आदी तालुक्यातही स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी जोर धरत आहे.

मरणानंतरही भोग संपेनामृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या माणसाला मृत्यू हे ठरलेलाच आहे. जीवन जगताना माणसाला संघर्ष करावा लागतो, मात्र, स्मशानभूमी नसलेल्या गावात मरणानंतरही भोग संपत नाही.

पावसाळ्यात आणखी हालस्मशानभूमी नसलेल्या गावात अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर सुरू चिखलातून अंतिमयात्रा काढावी लागते. पाऊस असल्यास हातात छत्री पकडून अंत्यसंस्कार करावे लागते. पावसामुळे अनेकदा मृतदेह जळून खाक होत नाही. अशाप्रकारचे हाल पावसाळ्यात सहन करावे लागतात.

जनसुविधेतून होणार ८६ कामेजिल्हा परिषदेला २०२३-२४ या वर्षासाठी जनसुविधा योजनेचा निधी मिळाला आहे. या निधीतून ८६ स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येणार आहे. यातील बहुतांश कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरही अनेक गावांत स्मशानभूमी शेडचा प्रश्न कायमच राहणार आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ