शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पोलीस ॲक्शन मोडमध्ये; जातीय दंगली घडविणाऱ्यांच्या कुंडलीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2022 5:00 AM

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय केले पाहिजे याचा कार्यक्रमच आखून दिला आहे. जातीय दंगली मध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी कलम १५१ (३), १४४ (२) याचाही आधार घेण्यात आला आहे. काहींना १४९ नुसार नाेटीस बजावण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बाधित होईल, असे कृत्य करू नये याबाबत सूचित करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात भोंग्यावरुन जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर इशारा दिला. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस दल कामाला लागले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जातीय दंगली घडविणाऱ्यांची कुंडली  गोळा केली जात आहे. यासाठी पाच वर्षातील गुन्ह्यांचा निकष ठेवण्यात आला आहे. वारंवार जातीय गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सलग दोन दिवस ध्वनीप्रदूषण, पर्यावरण अधिनियम याशिवाय त्या अनुषंगाने निघालेली शासनाची विविध परिपत्रके याचा अभ्यास केला. त्यावरून एक एसओपी तयार करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीसुद्धा पुसद येथील बैठकीत याबाबत निर्देश दिले. त्यावरून सोमवारी सर्व ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये दीर्घ चर्चा झाली. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय केले पाहिजे याचा कार्यक्रमच आखून दिला आहे. जातीय दंगली मध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी कलम १५१ (३), १४४ (२) याचाही आधार घेण्यात आला आहे. काहींना १४९ नुसार नाेटीस बजावण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बाधित होईल, असे कृत्य करू नये याबाबत सूचित करण्यात आले आहे. 

   मनसे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत? - वणी येथील मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना मंगळवारी रात्री नोटीस बजावण्याची प्रक्रिया करण्यात येत होती. त्याच वेळी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.

वणी पोलिसांची राजू उंबरकर यांना नोटीसn मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपासून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी परिसरात काही प्रमाणात मनसेची ताकद आहे. त्यामुळे वणी पोलीस सतर्क झाले आहेत. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह दहा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सीआरपीसी १९७३ चे कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. सध्या भोंगा (स्पीकर) यावरून राजकीय वातावरण तापलेले आहेत. आपणाकडून या संबंधाने विरोध म्हणून विनापरवाना भोंगा लावून नियमांचे उल्लंघन केल्यास आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल व सदरील नोटीस ही न्यायालयात आपल्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात येईल, असे या नोटिसीत स्पष्ट केले आहे. 

अपर अधीक्षकांच्या नियंत्रणात सनियंत्रण समिती- भोंग्याबाबत जिल्ह्यात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे या समितीचे प्रमुख आहे. याशिवाय गृहउपअधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी यांचाही समावेश या समितीमध्ये आहे. उपविभागीय अधिकारी या समितीचे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. त्यांच्या मार्फतच पोलीस ठाणे स्तरावरून कारवाई केली जाणार आहे. शिवाय नागरिकांनाही तक्रारी करण्यासंदर्भात या समितीची माहिती दिली जाणार आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस