शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धावती चारचाकी पेटली, चार जण सुखरूप; कळंब-नागपूर मार्गावरील घटना

By विलास गावंडे | Updated: March 23, 2024 17:21 IST

सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही.

कळंब (यवतमाळ) : यवतमाळवरुन नागपूरकडे जाणाऱ्या महेंद्रा किन्टो या चारचाकी (एमएच ३२- वाय १३३५) वाहनाने कळंबपासून दोन किलोमीटर अंतरावर अचानक पेट घेतला. यामध्ये वाहन जळून खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

हे वाहन अमोल बळीराम राठोड (५३, रा.सुखसागर सोसायटी, नागपूर) यांच्या मालकेचे आहे. ते कुटुंबासह यवतमाळवरून नागपूरकडे जात होते. त्यांच्या कुटुंबातील एक मुलगी ही गाडी चालवत होती. वाहनात चालक युवतीसह दोन महिला व दोन पुरुष, असे चार जण प्रवास करीत होते. 

कळंब शहर ओलांडल्यानंतर दोन किलोमीटर अंतरावरील मामाचा ढाब्याजवळ वाहनाच्या बोनेटमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. सर्वांना खाली उतरविण्यात आले. काही क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. हॉर्न डायरेक्ट होऊन शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले.  

आगीची माहिती मिळताच हायवे रोडच्या सेवेत असणारा टँकर घटनास्थळी पोहोचला. टँकरद्वारे आग नियंत्रणात आणने सुरू असताना अग्निशमन दल दाखल झाले. तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. या घटनेची नोंद कळंब पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघात