शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

आपत्ती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे फुलसावंगीत कोरोना रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:41 AM

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ...

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामतः रुग्ण वाढत आहेत. शेजारच्या जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास येथेही लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे.

मागील वर्षी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना गावाच्या बाहेर ठेवण्यासाठी गाव डोक्यावर घेणारे काही बोलबच्चन ग्रामपंचायतीच्या सत्तेत जाताच मूग गिळून गप्प बसले आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीसुद्धा बेशिस्त नागरिकांवर कारवाईसाठी धजावत नाही. त्यामुळे जे लोक नियमांचे पालन करतात, त्यांनासुद्धा आपणच का नियम पाळायचे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिक, ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, समन्वयाच्या अभावामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

बॉक्स

कर्मचाऱ्यांचे अपडाउन सुरूच

कोरोना काळातही ग्रामसेवक, तलाठी व पोलीस कर्मचारी यांचे पुसद, उमरखेडवरून येथे अपडाउन सुरू आहे. त्यामुळे गावातील बेशिस्त नागरिकांवर कुणाचाच वचक उरला नाही. ग्रामपंचायतीच्या सावध राजकारणामुळे गावाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. फुलसावंगीमध्ये वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंतेचा विषय आहे. ग्रामपंचायतीने निर्बंध न पाळणाऱ्या नागरिकांवर दोन महिन्यांपासून कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य विजयराव महाजन यांनी सांगितले.