शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

VIDEO: दुकान बंद करण्यासाठी आलेल्या जमावावर दुकानदारानं फेकली मिरचीपूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:54 IST

आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी आले असता केवळ दोन पोलीस त्या भागात तैनात असल्याने त्यांच्यावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.

यवतमाळ : बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान यवतमाळातील मारवाडी चौकात गालबोट लागले. यावेळी आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितल्याने वाद निर्माण होऊन तणाव वाढला. या आक्रमक आंदोलकांपासून बचाव करण्यासाठी एका मिरची विक्रेत्या व्यापारी कुटुंबाने मिरची पावडर फेकली. त्यामुळे काही काळ तणाव वाढला होता. यावेळी व्यापाऱ्यांनी ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्या.

आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी आले असता केवळ दोन पोलीस त्या भागात तैनात असल्याने त्यांच्यावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. त्यानंतर यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे हे अतिरिक्त कुमक घेऊन तेथे दाखल झाले व त्यांनी आंदोलकांना पिटाळून लावले. त्याच भागात शुक्रवारी महाराष्ट्र बंद दरम्यानही गालबोट लागले होते. त्यावेळी बंद समर्थक व विरोधक आमनेसामने उभे ठाकले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बुधवारच्या भारत बंदला यवतमाळ शहर व जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच ठेवली. त्यामुळे आंदोलक ही दुकाने बंद करण्यासाठी व्यापारपेठेत पोहोचली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. व्यापारी व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी दुकानातील साहित्य फेकणे, मारहाण असे प्रकारही घडल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र