शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

खरिपात शेतकऱ्यांना महागाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 5:00 AM

जिल्ह्यात आठ लाख ८० हजार हेक्टरवर खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी विविध बियाण्यांची मागणी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील निम्मे अधिक क्षेत्र कापसाचे असणार आहे. कापसाचे दर वाढल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या वर्षी चार लाख ५५ हजार हेक्टरवर कापूस लागवडीचे प्रस्तावित नियोजन कृषी विभागाने केले आहे.

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा कापसाला विक्रमी दर मिळाले आहेत. सध्या कापूस १२ हजार १०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. यामुळे कापसाचे लागवड क्षेत्रही ५० हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे. खरिपासाठी दोन लाख अतिरिक्त पाकिटांची मागणी बियाणे कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. २५ कंपन्या बियाणे विकण्यासाठी तयार आहेत. दुसरीकडे  खताच्या किमतीही भडकल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या खरिपात शेतकऱ्यांना इतर संकटाबराेबरच महागाईसोबतही सामना करावा लागणार आहे.   जिल्ह्यात आठ लाख ८० हजार हेक्टरवर खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी विविध बियाण्यांची मागणी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील निम्मे अधिक क्षेत्र कापसाचे असणार आहे. कापसाचे दर वाढल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या वर्षी चार लाख ५५ हजार हेक्टरवर कापूस लागवडीचे प्रस्तावित नियोजन कृषी विभागाने केले आहे. हे क्षेत्र पाच लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गतवर्षी चार लाख २० हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यासाठी २४ लाख ३० हजार १२२ पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. ४७५ ग्रॅमचे हे पाकीट गतवर्षी ७६७ रुपयांना मिळत होते. या वर्षी हे पाकीट ८१० रुपयांना मिळणार आहे. त्यामध्ये ४३ रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आली आहे. कापसाच्या खालोखाल सोयाबीनचे लागवड क्षेत्र आहे. या वर्षी दोन लाख ७३ हजार २३५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी ७४ हजार ३४९ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च बियाणे तयार केले आहे. यामुळे मागणी करण्यात आलेल्या बियाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. एकूणच खत आणि बियाण्यांच्या किमती वाढणार असल्याने येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणारा आहे. मजुरांच्या किमतीही वाढल्या आहेत. डिझेल, पेट्रोलचे दर वाढले आहेत. यामुळे शेतीची मशागतही वाढणार आहे. अशा स्थितीत निसर्गाचा प्रकोप आणि वाढत्या महागाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

आगीत तेल, केंद्राकडून सबसिडी हटविण्यासाठी हालचाली 

- खत, बियाण्यांच्या किमती वाढण्याचा अंदाज असल्याने बाजारात खतच उपलब्ध नाही. ४८ हजार ८२२ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. जिल्ह्याने दोन लाख १५ हजार ३०० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली आहे. मात्र, कंपनीने खतांच्या बॅगा पाठविलेल्या नाहीत. खतनिर्मितीसाठी लागणारे सल्फ्युरिक ॲसिड महागले आहेत. याशिवाय केंद्राकडून सबसिडी कमी करण्याच्या हालचाली आहेत. यामुळे खताच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेत आलेले २०:२०:०:१३ नावाचे खत १४७० रुपये दराने आले आहे. गतवर्षी या खताचे दर १२९० होते. १५:१५:१५: नावाचे खत १५०० रुपये बॅग प्रमाणे आहे. प्रत्येक रॅकमध्ये खताच्या दराच्या नव्या किमती पाहायला मिळत आहेत. डीएपी, एमओपी, एसएसपी खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ११ एप्रिलला दिल्लीत बैठक बोलविली आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.  

सोयाबीन बॅग महागणार- गतवर्षी सोयाबीन बियाण्याची बॅग ३ हजार रुपयांना होती. या वर्षी ही बॅग महागण्याचा अंदाज आहे. १५ एप्रिलनंतर सोयाबीनचे दर निश्चित होतील.  या वर्षी एक लाख २४ हजार हेक्टरवर तुरीची लागवड होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र जास्त आहे. मात्र बियाण्याची किंमत कमी राहण्याची शक्यता आहे. यासोबतच सात हजार ५०० हेक्टरवर ज्वारी, चार हजार ५०० हेक्टरवर मूग, चार हजार २५० हेक्टरवर उडीद पिकाची पेरणी होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती