शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

आणेवारीत आठ तालुक्यांवर अन्याय

By admin | Published: November 13, 2015 2:19 AM

जिल्ह्याची सुधारित पीक आणेवारी जाहीर करताना आठ तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे.

यवतमाळ : जिल्ह्याची सुधारित पीक आणेवारी जाहीर करताना आठ तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, १६ पैकी केवळ आठच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे उर्वरित आठ तालुक्यांमध्ये शासनाप्रती रोष निर्माण झाला आहे. यापूर्वी नजर आणेवारीत जिल्ह्यातील केवळ दोनच गावातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविण्यात आली होती, तर २०५३ गावातील आणेवारी सरासरी ६३ टक्के दाखविल्याने या गावांना दुष्काळी लाभापासून वंचित राहावे लागले. जिल्ह्यात यावर्षी प्रचंड दुष्काळ असताना व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या आणेवारीने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसच्या आंदोलनानंतर शासनाला निर्णय बदलावा लागला. पण हा निर्णय घेताना वणी, मारेगाव, आर्णी, पुसद, केळापूर, घाटंजी, राळेगाव व झरी या तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांच्यावर दाखविण्यात आली. हा या तालुक्यांवर अन्याय असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या आठही अन्यायग्रस्त तालुक्यात पुन्हा काळजीपूर्वक पीक पाहणी करून आणेवारी घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)