शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

जातपंचायतीच्या बहिष्काराची चौकशी करा

By admin | Published: January 12, 2016 2:21 AM

गवळी समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे एक कुटुंब तब्बल २५ वर्षांपासून हालअपेष्टा भोगत आहे.

एसपींचे आदेश : काटखेडा येथील प्रकारयवतमाळ : गवळी समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे एक कुटुंब तब्बल २५ वर्षांपासून हालअपेष्टा भोगत आहे. पुसद तालुक्यातील काटखेडा येथील या गंभीर प्रकाराची तक्रार झाल्यानंतर आता पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.काटखेडा येथील हरिभाऊ बेगाजी साखरे यांच्या कुटुंबावर जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात साखरे यांनी जातपंचायतीचे सदस्य लक्ष्मण मंदाडे, बबन साखरे, बाबूराव साखरे, गजानन आवसरे, भास्कर साखरे, मधुकर ढोकणे, अनंता साखरे, संजय मंदाडे, संदीप मंदाडे, गणेश साखरे, रमेश साखरे यांच्या विरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.हरिभाऊ साखरे यांनी आपली पहिली पत्नी लिलाबाई मंदाडे हिच्याशी ३ फेब्रुवारी १९६८ ला फारकत घेतली होती. त्यावेळी आपल्याला अपत्य नसल्याचे लिलाबाईने फारकतनाम्यात नमूद केले. मात्र फारकतीनंतर अनेक दिवसांनी झालेल्या अपत्याचा (देवीदास) पिता हरिभाऊच असल्याचा कांगावा करण्यात आला. लिलाबाईचे नातेवाईकच जातपंचायतीचे कर्ते-धर्ते असल्याने हरिभाऊवर या अपत्याला संपत्तीचा वाटा देण्याबाबत दबाव आणला गेला. या बाबीला विरोध केल्याने हरिभाऊ व त्याच्या कुटुंबीयांवर समाजाकडून बहिष्कार टाकण्यात आला. मारहाणीचे प्रकारही घडवून आणण्यात आले. याबाबत पाच दिवसात चौकशी अहवाल द्यावा, असा आदेश पोलीस अधीक्षकांनी पुसद ग्रामीण पोलिसांना दिला आहे. मात्र, १४ डिसेंबरच्या या आदेशावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही, असे तक्रारकर्त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)