शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:13 IST

यवतमाळातील युवकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे माझे वैयक्तिक उद्दीष्ट आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी याही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. येथील युवकांनी गुन्हेगारी टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्यावे, असे आवाहन यवतमाळचे नवनियुक्त अपर जिल्हा पोलीस अधीक्षक (आयपीएस) नुरुल हसन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

ठळक मुद्देनुरुल हसन : युवकांना चांगल्यासाठी प्रोत्साहित करणे वैयक्तिक उद्दिष्ट, बदल घडविण्याचा प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळातील युवकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे माझे वैयक्तिक उद्दीष्ट आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी याही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. येथील युवकांनी गुन्हेगारी टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्यावे, असे आवाहन यवतमाळचे नवनियुक्त अपर जिल्हा पोलीस अधीक्षक (आयपीएस) नुरुल हसन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. मीसुद्धा २०१५ च्या बॅचचा आयपीएस आहे. मात्र इथवरचा माझा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरू शकतो. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या कुटुंबात जन्म झाला. झोपडपट्टीमध्ये कच्चे घर होते. या परिसरात दूरदूरपर्यंत शिक्षणासाठी अनुकूल असे कुठलेच वातावरण उपलब्ध नव्हते. अशाही स्थितीत आपली वाट निवडत कठोर परिश्रमाने बी.टेक इलेक्ट्रीकल्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र ते अंतिम ध्येय नसल्याने अभ्यास सुरु होता. त्यानंतर भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चार वर्षे येथे काम करताना सोबतच आयपीएसची तयारी सुरू केली. वयाच्या २८ व्या वर्षी (२०१५ मध्ये) आयपीएस झालो. तेव्हापासून समाजातील प्रत्येक युवकात बदल घडविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मदत व मार्गदर्शनासाठी नेहमीच तयार असल्याचेही हसन यांनी सांगितले.जिल्ह्याकडून खूप काही शिकायचे आहेयवतमाळ जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. येथून खूप साºया गोष्टी शिकायच्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात काम करायचे आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या दिशेने काम करत येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची आहे. सध्या तरी जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रलंबित गुन्हे तत्काळ निकाली काढण्यासाठी, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिवाय समाजात सशक्त पोलिसींग दिसली पाहिजे याकरिता एसपींच्या मार्गदर्शनात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस