शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

काल्याच्या काळ्या कारनाम्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 5:00 AM

कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे काळ्याबाजारात विकले जात आहे, याचा पाठपुरावा करीत आहे. याचीच दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. काल्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी रेशनच्या काळ्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशनचा तांदूळ व गहू याची काळ्या बाजारात विक्री करणारी मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. या टोळीला आजपर्यंत अभय मिळत होते. याचा म्होरक्या कळंब येथील काल्या असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्या गोदामातून जवळपास १६ लाखांंचे रेशनचे धान्य जप्त केले. याशिवाय यवतमाळातही दोन धान्य घेवून जाणारे संशयित ट्रक पकडण्यात आले. रेशन माफियाचे नेटवर्क राज्यभर पसरले असून आंतरजिल्हा याची वाहतूक सुरू असते.  रेशन धान्यातून उभ्या केलेल्या काल्याच्या नेटवर्कचा तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली. कळंब ठाणेदारांनी या गुन्ह्यात न्यायालयाकडून काल्याची एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली होती. कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे काळ्याबाजारात विकले जात आहे, याचा पाठपुरावा करीत आहे. याचीच दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. काल्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी रेशनच्या काळ्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून, तेलंगणा सीमेवर रेशनचा तांदूळ, गहू साठवून त्याची विक्री केली जाते. या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यामध्ये अनेक बडे मासे  आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कळंबच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. रेशनचे धान्य परस्पर विकणाऱ्या या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर तयारी केली जात आहे. इतकेच नव्हे तर काल्याच्या यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, तेलंगाणा येथील नेटवर्कचाही शोध घेतला जात आहे. रेशनचा तांदूळ राईस मिलपर्यंत कसा पोहोचतो, घातक रसायने वापरुन या तांदळावर कशी प्रक्रिया करून त्याला सुगंधित तांदळात मिसळून विक्री केली जाते, याचाही शोध पोलीस घेणार आहे. 

पुरवठ्याच्या अहवालाने दोन ट्रक सुटले - जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार रेशनच्या धान्याच्या काळ्या बाजार चालविणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना नाही, धडधडीत दिसूनही रेशनचे धान्य हे पुरवठा विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते,  बरेचदा पुरवठ्याची यंत्रणा सोईस्कर भूमिका घेवून ते धान्य रेशनिंगचा नसल्याचा अहवाल देतात, त्यामुळेच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी भांबराजा येथे पकडलेला ५०० पोते संशयित तांदुळाचा ट्रक सोडून द्यावा लागला. तर जिल्हा वाहतूक शाखेने आर्णी बायपासवर पकडलेला ट्रकसुद्धा केवळ पुरवठा विभागाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सोडावा लागला. - पोलीस कारवाई करताच पुढे मात्र रेशनचा अहवाल निर्णायक ठरतो. यामुळेच बरेचदा रेशनच्या काळ्या व्यापाराची माहिती असूनही पोलिसांकडून कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नाही. पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याचेही सांगितले जाते. गरिबाचे धान्य हडपणाऱ्यांविरोधात पोलीस व पुरवठा विभागाला समन्वय ठेवूनच काम करावे लागणार आहे.  

 

टॅग्स :Policeपोलिसmafiaमाफिया