शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
2
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
4
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
5
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
6
"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
7
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
8
Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?
9
बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी
10
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
11
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?
13
IND vs NZ: ४६ धावांत All Out! Team India च्या नावे झाले हे ५ लाजिरवाणे विक्रम
14
“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका
15
श्रद्धाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री? राहुल मोदीसोबत ब्रेकअपनंतर बिझनेसमनसोबत अफेअरची चर्चा
16
नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
17
Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द
18
आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; व्यक्त न होण्याचं केलं आवाहन
19
नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय
20
IND vs NZ : चूक कोणाची? ताळमेळ नसल्यानं सोपा झेल सुटला; पाकिस्तानसारखी फजिती, रोहित संतापला

‘स्वरानंदवन’ ठरला अविस्मरणीय

By admin | Published: February 19, 2017 12:38 AM

शारीरिक अपंगांना दिला जाणारा करुणेचा सन्मान बदलणे ही काळाची गरज आहे. अपंगांना एका शिस्तबद्ध, रचनात्मक विचारसूत्रात गुंफले

स्फूर्तीदायक उपक्रम : विविध कलागुणांचे सादरीकरण काशीनाथ लाहोरे  यवतमाळ शारीरिक अपंगांना दिला जाणारा करुणेचा सन्मान बदलणे ही काळाची गरज आहे. अपंगांना एका शिस्तबद्ध, रचनात्मक विचारसूत्रात गुंफले तर त्यांच्या संघटित क्षमता अनेकपटीने वाढतात. याचे स्वरानंदवन हे उत्तम उदाहरण आहे. समाजानेच समाजाच्या हितासाठी लढायला हवे, हा संदेश देणारा स्फुर्तीदायक उपक्रम आहे. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यवतमाळ अंतर्गत छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी येथील समता मैदानात स्वरानंदवन या स्वर संगीत रजनीचा कार्यक्रम घेण्यात आला. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून आणि डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संगीत व नृत्य अविष्कार आहे. डॉ. विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विचारपिठावर अशोक घारफळकर, सुषमा राऊत, पप्पू भोयर, प्रा.डॉ. संगीता घुईखेडकर, राजेंद्र घोंगडे, आशा तरोणे, डॉ. अनिल पटेल, डॉ. पी.डी. काळमेघ, प्रदीप साळवे, वैशाली सवाई आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजी राजे पुरस्काराने प्रांतीक विवेक देशमुख यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या ‘मातीची कुस्ती’ या लघुपटाला पुरस्कार मिळाला आहे. हा लघुपटही यावेळी दाखविण्यात आला. प्रास्ताविक प्रा. सुनील कडू यांनी केले. संचालन कैलास राऊत, आभार राजू भोयर यांनी मानले. मूक-बधिरांच्या गणेशवंदनेने स्वरानंदवनचा प्रारंभ झाला. सुनीलकुमार याने महाराष्ट्र गीत सादर केले. विकलांगाच्या भावना व्यक्त करणारे गीत सोनू या कलावंताने सादर केले. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ हा कुष्ठरोगमुक्त रुग्णांसाठीचा संदेश होता. पुरुषोत्तम चांदेकर आणि सोनू यांचे युगल गीत ‘जिंदगी हर कदम एक नयी जंग है’ सादर करण्यात आले. वेगवेगळ्या प्राण्यांची वेशभूषा केलेल्या कलावंतांनी आलिशा चिनॉयचे ‘मेड इन इंडिया’ सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. निसर्गत: गुडघ्याखाली पाय नसलेल्या गजानन भगत याने उत्तम नृत्य केले. हेमलकसामधील आदिवासी नृत्य, लावणी, वंदे मातरम्, पिंगा ग पोरी पिंगा आदी अनेकरंगी कलागुणांचा अविष्कार यावेळी पहावयास मिळाला. सदाशिव ताजने यांचे व्यवस्थापन, सुनील कदम यांचे हिंदी, मराठी उत्कृष्ट निवेदन, उत्तम कर्णमधूर संगीत, आकर्षक प्रकाश योजना असल्याने स्वरानंदवन कार्यक्रम अतिशय बहारदार आणि अविस्मरणीय ठरला. दिव्यांगाप्रती आदरभाव निर्माण करणारा हा संगीत उपक्रम यवतमाळकरांच्या चिरकाल स्मरणात राहणारा आहे. १५० कलाकारांची चमू, देशभर १५०० कार्यक्रम स्वरानंदवनच्या चमूने १५०० कार्यक्रम भारतभर करून शारीरिक अपंगत्व असणाऱ्या समाजात अभिमानाचे व हक्काचे स्थान मिळविण्याची प्रेरणा दिली आहे. १५० कलाकारांचा समावेश यात असून अधिकांश अंध, दिव्यांग, मूक-बधिर, रोगमुक्त कुष्ठरुग्ण आहेत. अत्याधुनिक वाद्यवृंद, रोषणाई, ध्वनी व्यवस्था, संस्थेची स्वत:ची वाहने या चमूजवळ आहे. निसर्गदत्त अपंगत्वावर मात करून ज्ञान आणि मनोरंजनाचा वसा घेतलेल्या या कलावंतांना अन्न, वस्त्र, निवारा आदी सर्व सुविधा महारोगी सेवा समितीद्वारा दिल्या जातात. स्वरानंदवनच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या निधीतून ५०० घरांचे हिम्मतग्राम (कलाकारांचे ग्राम) शिक्षण प्रशिक्षण आणि पुनर्वसन आदी अद्यावत सुविधांसह उभारण्याचा डॉ. विकास आमटे यांचा संकल्प आहे.