शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

जैन संघटना आपत्तीच्या वेळी धावून जाते

By admin | Published: January 14, 2016 3:28 AM

गुजरातमध्ये २००१ साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर ३६८ शाळांचे निर्माण करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.

शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प : मदतीसोबत पुनर्वसनही यवतमाळ : गुजरातमध्ये २००१ साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर ३६८ शाळांचे निर्माण करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. काश्मिरमध्ये आॅक्टोबर २००५ मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी ‘एनडीएमए’ने सर्वप्रथम पुनर्वसन कामासाठी भारतीय जैन संघटनेची मदत घेतली. एका महिन्यात घरे बांधून दिली, असे प्रफुल्ल पारख यांनी सांगितले. अकोला येथे २००२ साली महापूर आला होता. पूरग्रस्तांनी शाळांमध्ये आश्रय घेतला होता. ही मंडळी तेथून बाहेर निघायला तयार नव्हती. त्यावेळी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेऊन १५ हजार नागरिकांसाठी दोन तात्पुरते नगर वसविले आणि शाळा रिकाम्या करून दिल्या, असे ते म्हणाले. त्सुनामीच्या वेळी अंदमान निकोबारमध्ये आपण स्वत: १५ महिने त्या भागात होतो. ३७ बेटांवर शाळा, रुग्णालये उभारण्यात आले. २००८ साली बिहारमध्ये आलेल्या पुरात आमच्या चमूने १८० दिवस वैद्यकीय सेवा दिली. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी धावून जावून मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही मदतच नाही तर त्यांचे पुनर्वसन करतो, असे पारख यांनी सांगितले. शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासोबतच आपल्या परिसराच्या विकासासाठीही प्रोत्साहीत करतो. १९९७ मध्ये मेळघाटमधून ३०० गावातून ३२८ मुलांची निवड करून पुणे येथे शिक्षण दिले. आज ही मुले आपल्या परिसरात विकासाचे काम करीत आहे. आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण देवून त्यांना मदतीचा हात भारतीय जैन संघटना देणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच आम्ही या प्रकल्पासाठी मुलींचीही निवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबात आत्महत्या झाली असेल तर त्या कुटुंबातील मुलांच्या डोक्यातही आत्महत्येचे विचार घोळत असतात. हे सर्वेक्षणातूनही सिद्ध झाले आहे. पुणे येथे शैक्षणिक प्रकल्प राबविताना तसे अनुभवही आले. परंतु त्या मुलांच्या डोक्यातील आत्महत्येचे विचार करून त्यांचा दृष्टीकोण सकारात्मक करण्याचा प्रयत्नही या प्रकल्पातून होत असल्याचे पारख यांनी शेवटी सांगितले. (नगर प्रतिनिधी)