शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

येळाबाराच्या महिला वनरक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

By admin | Published: January 10, 2017 1:05 AM

महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील

बेरोजगार पतीकडून छळ, वसतिगृहात आश्रय : मृतक जमादाराची मुलगी यवतमाळ : महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील खरोली शिवारात सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या घटनेने वन विभागासह शहरात एकच खळबळ उडाली. पूनम रणजित भाटी (२७) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. पूनमचा विवाह २००६ मध्ये जांब येथील रणजित नरेश भाटी (३०) याच्याशी झाला होता. त्यावेळी रणजित हा औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीवर होता. दरम्यान लग्नानंतर पूनमला वन विभागात वनरक्षक म्हणून २०१५ मध्ये नोकरी लागली होती. ती सध्या वडगाव जंगल वनपरिक्षेत्रातील येळाबारा येथे विशेष सेवा रक्षक म्हणून कार्यरत होती. पत्नीला नोकरी लागल्याने रणजितने नोकरी सोडून दिली आणि दोघेही जांब येथे राहू लागला. पत्नी नोकरी करणारी आणि रणजित बेरोजगार असा संसार सुरू होता. त्यातूनच रणजितचा पुरुषी अहंकार जागृत झाला. पूनमचा छळ सुरू झाला. तिला मारहाण केली जात होती. या जाचाला कंटाळूनच पूनमने यवतमाळ येथील मुलींच्या वसतिगृहात आश्रय घेतला होता. सोमवारी सकाळी रणजित मुलीच्या वसतिगृहात आला. त्याने पूनमला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खरोली शिवारातील स्वत:च्या शेतात नेले. त्या ठिकाणी त्याने पूनमचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान रणजितचा चुलत भाऊ मनोज रमेश भाटी याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रणजितला ताब्यात घेतले. दरम्यान पूनमचे वडील सुदर्शन धांदू रा. रुद्रापूर ता. बिलोली जि. नांदेड यांना या घटनेची माहिती मिळाली. ते हदगाव ठाण्यात जमादार म्हणून कार्यरत आहे. या खुनात भाटी कुटुंबातील इतरही काही जण सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र वृत्तलिहिस्तोवर पोलिसांनी धांदू यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती. तपास ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धनरे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) -तर अनर्थ टळला असता ४दरम्यान रणजितकडून पैशासाठी तिला नेहमीच त्रास दिला जात होता. अनेकदा तो मुलींच्या वसतिगृहात जाऊन पूनमला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. याच जाचाला कंटाळून पूनमने १५ दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांनी नेहमीप्रमाणे तक्रार नोंदविण्याऐवजी समजूत काढून त्यांना परत पाठविले. त्याच वेळी पोलिसांनी रणजितविरुद्ध कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.