शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

कळंबच्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शनच गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:44 AM

गजानन अक्कलवार कळंब : येथील एका शेतकऱ्यावर शेतातील वीज जोडणीच चोरीला गेली म्हणण्याची वेळ आली आहे. कारण जोडणी नसतानाही ...

गजानन अक्कलवार

कळंब : येथील एका शेतकऱ्यावर शेतातील वीज जोडणीच चोरीला गेली म्हणण्याची वेळ आली आहे. कारण जोडणी नसतानाही बिल देण्याचा प्रताप येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

कळंब येथे खंड -१ मधील सर्व्हे नंबर २९७ हे नंदकिशोर महादेव दलाल यांच्या मालकीचे शेत आहे. २०१७ मध्ये त्यांनी शेतातील विहिरीवर मोटार पंपाकरिता वीज जोडणीची मागणी केली. त्यासाठी रीतसर अर्ज दिला. वारंवार कार्यालयात चकरा मारल्या. त्यानंतर आपल्या नावाने वीज कनेक्शन आल्याची माहिती त्यांना देण्यात आली; परंतु अद्याप त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे ते वैतागून गेले. मात्र, २०१९ पासून त्यांना विजेचे बिल नियमित दिले जात आहे. वीज जोडणी नसताना बिल कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांपासून वीज जोडणीची आस आहे. काही दिवसांपूर्वी परसोडी (बु.) येथील शेतकऱ्याने वीज जोडणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने आत्महत्येचा इशारा दिला होता. एवढेच नाही तर जोडणी करताना तोंड पाहून ती केली जाते, असा आरोपही करण्यात आला होता. येथील भोंगळ कारभाराचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

बॉक्स

असा झाला भंडाफोड

शेतकरी नंदकिशोर दलाल यांना त्यांच्या ओळखीतल्या एका कर्मचाऱ्याने वीज बिल बाकी असल्याची माहिती दिली. मात्र, जोडणीच नसताना बिल कसे, असा त्यांना प्रश्न पडला. याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन तपासणी केली. त्यात आपल्या नावाचे बिल पाहून त्यांना धक्का बसला. आता तरी त्वरित जोडणी करून द्यावी. एवढेच नाही तर या प्रकरणात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नंदकिशोर दलाल यांनी केली आहे. शाखा अभियंता अभिजीत भोयर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे सांगितले.