शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची केली जिल्हा बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 5:00 AM

आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  अर्धांगवायू झाल्याने अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची थेट जिल्ह्याबाहेर वाशिम येथे बदली केली. इतकेच नव्हे तर त्यांना पुसद येथून तत्काळ कार्यमुक्तही करण्यात आले. या   कारभारामुळे उपासमार होत असून, वनविभागाची यंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याची खंत कर्मचारी रमेश सुरोशे यांनी व्यक्त केली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रात तपासणी नाक्यावर कार्यरत असताना सुरोशे यांना ९ मे २०१९ रोजी कर्तव्यावर असतानाच अर्धांगवायूचा झटका आला. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. अंथरुणावर असतानाच कुठलीही पूर्वकल्पना न देता सामाजिक वनीकरण वाशिम येथे त्यांची विभाग बदली करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना उपवनसंरक्षक यांनी तत्काळ कार्यमुक्तही केले. आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.   जगण्याचा मूलभूत अधिकारच बाधित केला आहे. या अन्यायाविरोधात राज्याच्या लोकायुक्त, वनविभागाचे प्रधान सचिव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सुरोशे यांनी सांगितले.   

रुग्णालयात असताना सक्तीची कार्यमुक्ती का?- सोईच्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतरही वरिष्ठ त्याला कार्यमुक्त करीत नाही. रमेश सुरोशे यांच्या प्रकरणात ते रुग्णालयात भरती असतानाही त्यांना परस्पर कार्यमुक्त केले. येथे वरिष्ठांनी सहानुभूती दाखविलेली नाही. त्यांना अडचणीच्या काळात मदत सोडा, हक्काचे वेतनही दिलेले नसल्याचे सुराेशे यांनी सांगितले. वनपाल पदावर  एकच पदावधी झालेला असताना विभागाबाहेर केलेली बदलीही निमयबाह्य असल्याचे सुरोशे यांचे म्हणणे आहे.

 शेंबाळपिंपरी वन नाक्यावर असलेले वनपाल रमेश सुरोशे यांची २०१९ मध्ये बदली झाली. मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशावरुनच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. या प्रकरणात यापेक्षा जास्त माहिती नाही. - सचिन सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

टॅग्स :forest departmentवनविभाग