शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

ड्रमभर पाण्यासाठी खाकी वर्दीही रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 10:20 PM

शहरातील विघातक घटनांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. त्यात आता पाण्यासाठी भांडणतंटे होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. पण खुद्द पोलीसांच्या घरीच पाण्याचा थेंब नाही.

ठळक मुद्देपोलीस वसाहतीत टंचाई : नगरपरिषद, पोलीस विभागाचाही टँकर फिरकेना

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील विघातक घटनांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. त्यात आता पाण्यासाठी भांडणतंटे होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. पण खुद्द पोलीसांच्या घरीच पाण्याचा थेंब नाही. स्वत:च्या घरात पाणी आणणे आणि ते कुलूप लावून जपणे, ही विदारक स्थिती चक्क पोलीस वसाहतींमध्ये आहे. पोलीस वसाहतींमध्ये मुबलक पाणी असले तरी नियोजनाची टंचाई असल्याने पोलीस कुटुंबीयांची तहानेने वाताहत होत आहे.ड्रमभर पाण्यासाठी पोलीसांच्या आप्तांना रात्रभर जागावे लागत आहे. दिवसभर रस्त्यावर ड्रम ठेवून टँकरची वाट पाहिली जाते, पण टँकरच येत नाही अन् रिकामा ड्रम घेऊन पोलिसांना इतर वसाहतींमध्ये चकरा माराव्या लागत आहे. गेल्या २० दिवसांपासून या भागात नळ नाही. खाकी वर्दी पाण्यासाठी अक्षरश: रांगेत उभी असल्याचे चित्र आहे. पळसवाडी कॅम्प, कवेलू वसाहत आणि पोलीस वसाहतीच्या १३ इमारतींमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागात मुबलक पाण्याचे स्त्रोत आहे. मात्र नियोजनच नाही. यामुळे पाण्याठी रात्र जागून लगतच्या भागातून पाणी आणावे लागते. हापशी आणि बोअरचा आधार घ्यावा लागतो. पोलिसांच्या अर्धांगिणी अक्षरश: वैतागल्या आहेत.नगरसेवकाचे उद्धट उत्तरकवेलू वसाहतीमध्ये २० दिवसांपासून नळ नाही. महिलांनी पाण्यासाठी नगरसेवकांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यांना तितक्याच उद्धटपणाने अरेरावीचे उत्तर ऐकायला मिळाले. आपल्या भागात दररोज टँकर येतो, असे म्हणून नगरपरिषदेचा एकही टँकर या भागाकडे फिरकला नाही. गत चार दिवसांपासून या भागातील महिला पाण्याच्या टाक्या रस्त्यावर आणून ठेवतात आणि दिवसभर प्रतीक्षा करतात. पुन्हा टाक्या नेऊन ठेवतात. मात्र कोणीही त्यांची दखल घेत नाही, अशी खंत सुवर्णा गायकवाड यांनी व्यक्त केली.वर्दी धुवायची कशी?पोलीस वर्दीला स्वच्छ ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा होतो. आता पुढील काळात वर्दी धुण्यासाठी पाणी मिळणार की नाही, हा प्रश्नच आहे. सध्या आठ दिवसानंतरच आम्ही कपडे धुण्यासाठी पाणी वापरतो. या पाण्याचा इतर कामासाठी वापर करीत आहे. पाण्याच्या काटकसरीनंतरही आम्हाला पाणी मिळत नाही, अशी खंत कविता आमनेरकर यांनी व्यक्त केली.पाण्यासाठी घरातच कैदउन्हाळयाच्या सुटीत पाहुण्यांना येण्यासाठी निमंत्रणही देऊ शकत नाही. पाण्याची स्थिती पाहून बाहेरगावची मंडळी येण्याचे टाळत आहे. पाण्यामुळे कुठे जाताही येत नाही. पोलिसांचे कुटुंबीय घरातच कैद झाले. पोलीस वसाहतीचे हे चित्र अतिशय चिंताजनक आहे. पाण्यासाठी हापशीवर महिलांना जावे लागते. मात्र याला आमचा नाईलाज आहे, असे अश्विनी भुजाडे म्हणाल्या. पाण्यासाठी नगरसेवकाला सांगून कंटाळलो, असे पुष्पा गायकवाड म्हणाल्या. कवेलू क्वॉर्टरला विहीर आहे. मात्र त्यात कचरा आहे. ही विहीर साफ करून उपसा केला तर मुबलक पाणी लागेल. याबाबत आम्ही वारंवार सांगितले. परंतु अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. एखादी हापशी तरी गरजेची आहे, असे त्या म्हणाल्या.नियोजनचा अभावया भागात प्रत्येक बिल्डिंगपर्यंत अंडरग्राउंड पद्धतीने पाईप बसवून पाण्याचे पॉर्इंट दिले तर पाण्याचा अर्धा प्रश्न सुटतो. पळसवाडी मैदानातील बोअरवेलला मुबलक पाणी आहे. त्याचा वापरच होत नाही. या पाण्याचा वापर झाला तर पोलीस वसाहतीमधील पाणीप्रश्नच सुटतो. त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत अरविंद जाधव यांनी व्यक्त केले.गोदाम फैल, शास्त्रीनगरात सीओंना घेरावदरम्यान, मंगळवारी गुरूदेव युवा संघाच्या नेतृत्वात गोदाम फैल आणि शास्त्रीनगरातील महिलांनी पालिकेवर धडक दिली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. नागरिकांनी दररोज पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा करण्याची विनंती केली. यावेळी गुरूदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, शंकर जतकर, रूपेश शस्त्रकार, राहुल मसराम, अनिल शेंडे, चेतन कटले, कैलास मडावी, गोपाल राऊत, नरेश मेश्राम, सरीता रिनाईत, पूजा रिणाईत, सुशिला राय, सुशिला मलकापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.पोलिसांच्या घरात पाण्याला कुलूप१३ बिल्डींगमधील पाण्याची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. या ठिकाणी पाणी वितरणासाठी दक्षताजवळील बोअरवेलवरून पाच पॉर्इंट देण्यात आले. या पॉर्इंटवरून पाणी इमारतीपर्यंत नेण्याची जबाबदारी मात्र कोणीच घेतली नाही. या भागातील कुटुंबीयांनी लोकवर्गणीतून पाईप घेतला. हा रबरी पाईप मोजक्याच इमारतीपर्यंत पोहचतो. त्यातही प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचत नाही. बिल्डिंगपासून पाण्याच्या पॉर्इंटपर्यंत बरेच अंतर आहे. या काळात ज्या गृहिणीने पाणी घरापर्यंत नेले, तर थोड्याच वेळात दुसरा कोणीतरी पॉर्इंटचा पाईप काढतो. स्वत:चा पाईप लावतो. यामुळे एका घरातले पाणी भरण्यासाठी तीन ते चार तास लागतात. यामुळे बोअरला पाणी असले तरी एकाच बिल्डिंगमध्ये दुसºया घराला पाणी मिळण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. ज्या दिवशी नळाचे पाणी येणार त्या दिवशी टाक्या भाड्याने आणून पाणी भरले जाते. इतकेच नव्हेतर पोलीस वसाहतीमध्ये पाणी कुलूपात ठेवावे लागते.

टॅग्स :Waterपाणी