शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

सावित्री-जिजाऊंचे घरोघरी उजळणार आकाशदिवे; आजपासून दहा दिवस विचारांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:10 IST

गावोगावी पोहोचताहेत महानायिकांच्या चित्रांचे दिवे; रांगोळींनी सजणार अंगण

अविनाश साबापुरे

यवतमाळ : महाराष्ट्राला ज्ञानाचा प्रकाश दाखविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून ते साकार करणाऱ्या जिजाऊ माँसाहेब या दोन महानायिकांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रात दहा दिवस ज्ञानदिव्यांची दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी तरुणांनी चित्रमय आकाशदिवे साकारले असून या दिव्यांसाठी गावोगावी नोंदणी करण्यात आली आहे. घरोघरी हे आकाशकंदिल उजळणार असल्याने ३ ते १२ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात विचारांची दिवाळी अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्रातील काही तरुणांनी एकत्र येत ‘संविधान प्रचारक’ अशी चमू तयार केली आहे. या चमूमार्फत मागील वर्षीपासून महानायिकांच्या आकाशकंदिलाचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षी केवळ २०० आकाशकंदिल त्यांना पोहोचविता आले. परंतु, यंदा त्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी करून मोठ्या प्रमाणात हे कंदिल गावोगावी पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक तयार केले आहेत. त्या माध्यमातून आतापर्यंत काही हजारांपेक्षा अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. ३ जानेवारी, सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ माॅसाहेब जयंतीपर्यंत हे दिवे घरोघरी लावून, रांगोळी काढून ‘सावित्र जिजाऊ’ उत्सव साजरा करण्याचे आवाहन या चमूने केले आहे.

- आकाशकंदिलांचे वैशिष्ट्य

संपूर्णपणे कागदी असलेल्या या आकाशकंदिलांवर दोन बाजूंनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माॅसाहेबांची प्रतिमा आहे. तर उर्वरित दोन बाजूंवर फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, झलकारी बाई, इंदिरा गांधी या महानायिकांच्या प्रतिमा आहेत.

रोज सांगणार एका महानायिकेची गोष्ट

३ ते १२ जानेवारी या सप्ताहात सोशल मीडियाच्या माध्यमातून दरदिवशी गोष्टरूपात महानायिकांच्या कार्यजीवनाची कथा घराघरांत पोहोचविली जाणार आहे. सावित्रीबाई, जिजाऊ, फातिमा, अहिल्या, रमाई, ताराबाई, इंदिरा, झलकारी, मदर तेरेसा, अशा महानायिकांचे जीवनचरित्र कथाकथनाच्या उपक्रमातून पुढे आणणार असल्याचे संविधान प्रचारक चमूकडून सांगण्यात आले.

हा उत्सव कुटुंब स्तरापासून ते संस्थात्मक व सामाजिक स्तरावर साजरा होणार आहे. आपल्या महानायिकांचे विचार व कार्य घरोघरी पोहोचवणे हा यामागील उद्देश आहे. या उत्सवात कंदील, दिवे लावून, गोडधोड करून उत्साहाने महानायिकांचा उत्सव साजरा व्हावा. ही विचारांची दिवाळी आहे.

- देवीदास शंभरकर, उपक्रमाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक

टॅग्स :SocialसामाजिकSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तव