शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

कुमारीमातांची मुंबईत दखल

By admin | Published: January 14, 2016 3:05 AM

आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील कुमारीमातांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे.

नीलम गोऱ्हे आज यवतमाळात : पालकमंत्र्यांची आढावा बैठक यवतमाळ : आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील कुमारीमातांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या मदत व पुनर्वसनाच्या मुद्यावर गुरुवार १४ जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा बैठक बोलविली असून शिवसेनेच्या महिला नेत्या आमदार नीलम गोऱ्हे या बैठकीला विशेषत्वाने उपस्थित राहणार आहे. आमदार नीलम गोऱ्हे यांनी यापूर्वीही झरी तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन कुमारीमातांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. मात्र त्यानंतर कुमारीमातांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने तेवढे प्रभावी काम होऊ शकले नाही. त्यामुळेच गुरुवारी आमदार नीलम गोऱ्हे स्वत: या बैठकीला उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणा असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. या कुमारी माता व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी पांढरकवडा तालुक्यात शासनाने काही एकर जागाही निश्चित केली होती. तेथे निवासी बांधकाम करण्याचेही ठरले होते. मात्र केवळ निवास व्यवस्था हे पुनर्वसन नसून त्यांच्या उपजीविका व रोजगाराचे काय असा प्रश्न पुढे आल्याने हे पुनर्वसन काहीसे थंडबस्त्यात पडल्याचे सांगितले जाते. शेजारच्या तेलंगाणा राज्यातील व्यापारी मिरची शेतीच्या निमित्ताने झरी तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये येतात, चिटुकमिटूक वस्तूंचे आमिष देऊन त्यांचे शोषण केले जाते. नंतर या शोषणकर्त्यांचा थांगपत्ताच लागत नाही. कुमारीमाता पोलिसात तक्रार देणे टाळतात. त्यामुळेच या नराधमांचे फावते आहे. शेतकरी आत्महत्यांप्रमाणेच कुमारीमाता हा सुद्धा शासन-प्रशासनात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येकव् ोळी कोणी तरी कोठून तरी येतो, या कुमारीमातांचे फोटो काढतो, आढावा घेतो, सांत्वन करतो, भेटी देतो मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी मदत म्हणून काहीच पडत नाही. म्हणूनच या कुमारीमाता आता अशा भेटणाऱ्यांवरही संताप व्यक्त करताना दिसतात. (जिल्हा प्रतिनिधी) १४१ माता, ४२ मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न झरी तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये अनेक कुमारीमाता आहेत. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात त्यांची संख्या १४१ तर त्यांच्या मुलांची संख्या ४२ एवढी नोंदविली गेली. सुरुवातीला मदत मिळणार म्हणून कुमारीमातांचा हा आकडा अचानक फुगला होता. रितसर विवाह झालेल्या महिलाही मंगळसूत्र लपवून स्वत:ला कुमारीमाता दाखविण्याचा प्रयत्न करीत होत्या, अशा तक्रारी आहे. मात्र प्रशासनाने त्यानंतर काटेकोर सर्वेक्षण करून कुमारीमातांचा नेमका आकडा निश्चित केला. आजही प्रशासनावर चुकीचे सर्वेक्षण केल्याचा, कुमारीमातांचा ‘वास्तव’ आकडा दडपल्याचा आरोप झरी परिसरातून होताना दिसतो.