शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जीवनदायीचा लाभ

By admin | Published: May 25, 2016 12:16 AM

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आता जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

शासनाचा निर्णय : शेतकरी कुटुंबीयांच्या फायद्याची योजना, सात-बाराच्या उताऱ्यावरही मिळेल योजनेचा लाभयवतमाळ : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आता जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. राज्यात ३१ मे २०११ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविण्यास सुरवात करण्यात आली. सुरवातीला या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा व दारिद्रय रेषेवरील एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, आता यामध्ये शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयासह अमरावती विभागातील चार, औंरगाबाद विभागातील आठ जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शुभ्र शिधापत्रिका उपलब्ध नसल्यास सात-बाराच्या उताऱ्यावर सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी कुटुंबांचा व्यवसाय हा फक्त शेती एवढाच असणे आवश्यक राहणार असून शासकीय, निमशासकीय सेवेत असलेल्या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच जिल्हयातील सर्वच शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा अतिरीक्त विमाहप्ता विमा कंपनीस अदा करण्यात येईल, ज्या शेतकरी कुटुंबांकडे शुभ्र शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्यांना सात-बाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचे नाव शुभ्र शिधापत्रिका व सात-बारा उताऱ्यात समाविष्ट नसल्यास हा सदस्य त्या कुटुंबातीलच असल्याबाबतचे संबंधीत महसुली अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. त्यामुळे शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)