शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

असाह्य मजुरांचा जीवघेणा प्रवास थांबता थांबेना..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:00 AM

शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या गावी जाणार, असा निर्धार करीत हजारो मैलांचा पायी प्रवास या मजुरांनी सुरूच ठेवला.

ठळक मुद्देस्वगृही जाण्याची आस : रखरखत्या उन्हात हजारो मैल पायी प्रवास, हालअपेष्टांनी मजूर जेरीस, मदतही मिळेना

प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : सर्वत्र लॉकडाउन, त्यात रखरखते ऊन, रस्त्याने ना खाण्याची ना पिण्याच्या पाण्याची सोय. खिशात दमडी नाही. माय-बापाच्या कडेवर चिमुकली लेकरं, डोक्यावर प्रपंचाच ओझं, जागोजागी चौकशीचा त्रास, पायी चालून चालून क्षीण झालेले शरीर. कुठे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची छाया, कधी ट्रकमधून लपूनछपून प्रवास. कधी पायी, मिळेल त्या वाहनात बसून आपल्या गावी जाण्याची आस असलेल्या मजुरांचा हजारो मैलांचा जीवघेणा प्रवास अद्याप थांबलेला नाही.हैद्राबादवरून मधप्रदेश, उत्तरप्रदेशकडे आपल्या गावी, मातृभूमीकडे निघालेल्या स्थलांतरीत मजुरांचे पांढरकवडा तालुक्यातून जाणारे असाह्य मजुरांचे लोेंढे व त्यांच्या यातना पाहून सारेच गलबलून जात आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाउनमुळे अनेक मजूर अडकून पडलेत. शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या गावी जाणार, असा निर्धार करीत हजारो मैलांचा पायी प्रवास या मजुरांनी सुरूच ठेवला. सुरूवातीला काही सामाजिक संस्थांनी, काही गावातील नागरिकांनी जेवण व पाण्याची सोय केली. परंतु मजुरांचे लोंढेच सुरू झाल्याने त्यांच्या मदतीला मर्यादा आल्या. प्रशासनच्यावतीने मजुरांचे स्तलांतर थांबविण्यासाठी काही ठिकाणी त्याची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. दरम्यान, मजुरांचे पायी चालत जाणे सुरूच राहिले. ३०० ते ४०० मजुरांचे जथ्थे पायी चालत हैदराबाद येथून निघून पांढरकवडात पोहचले. कुणी पायी चालत होते, तर कुणी मिळेल त्या झाडाच्या सावलीत थांबून विसावा घेत आहेत. यातील अनेकजण उपाशीपोटी होते. काहींना पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नव्हते. काही वेळ थांबून बैतुल मधप्रदेशकडे ते रवाना झाले होते. असे मजूर दररोज पायीच चालत असताना दिसत आहेत. राज्या-राज्यात प्रवेशबंदी आहे. तरी या मजुरांना रोखणे अशक्यप्राय झाले आहे. हजारो मजूर एकत्र निघाले असताना कोरोना संसर्गाची भीती आहे. तरीसुद्धा मरू पण आपल्या गावी जाऊन मरू, असे म्हणत या मजुरांनी आपल्या गावी जाण्याची आस सोडली नाही. आता मजुरांना जाण्याबाबत काही नियम शिथिल झाले आहेत. काही ठिकाणी वैद्यकीय शिबीर सुरू आहे. त्या ठिकाणाहून मजुरांना वाहनांची व्यवस्था करण्यात येत असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Labourकामगार