शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही गद्दारांना धडा शिकवा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:02 IST

दारव्हा येथे माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ सभा : मतदारांची अलोट गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : या भागातील खासदार, आमदारांनी केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत मतदानाद्वारे गद्दाराला धडा शिकवा, असे आवाहन शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

दारव्हा येथील माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे, खासदार संजय देशमुख, कॉग्रेसचे पक्ष निरीक्षक खा. रवी मल्लू, आमदार मिलिंद नार्वेकर, मेघा रेड्डी, माजी आमदार संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, बाळासाहेब मांगुळकर, जितेंद्र मोघे, मनीष पाटील, प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, पी.बी. आडे, पवन जयस्वाल, प्रवीण शिंदे, संजय मोघे, संतोष ढवळे, वर्षा निकम, जितेश राठोड, शरद माहूरे, बाबूपाटील जैत, नितीन माकोडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच संजय राठोड यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली, समाजाचा दुरुपयोग करून आपल्या तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे, मुंबईत सेवालाल महाराज संस्थेसाठी शासनाने दिलेली जमीन हडपली. ही बंजारा समाजाशी बेईमानी आहे. आपले सरकार येताच, पहिले या प्रकरणाची चौकशी करण्याचा इशारा त्यांनी दिला. मधल्या काळात यांच्यावर आरोप झाले तेव्हा, मांडीला मांडी लावून बसण्याची लाज वाटत होती, तेव्हा मिंधेच याला वाचवायला मागे लागले होते, परंतु आपण मंत्रिमंडळाबाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांवर हल्ला चढविला. इकडे येऊन वाकडे तिकडे आव्हान देऊ नका, अशा शब्दांत ठणकावले. या सरकारच्या काळात कोणताही घटक खूश नाही, परंतु आपले सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, महिलांना महिन्याला तीन हजार रुपये, मुलांना मोफत शिक्षण, गुजरातला पळविलेले उद्योग परत आणून बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सूत्रसंचालन कैलास राऊत, तर आभार सय्यद फारुख यांनी मानले. 

खासदार देशमुख यांनी मांडल्या स्थानिक समस्या खासदार संजय देशमुख यांनी मार्गदर्शन करताना मतदारसंघातील दिग्रस राष्ट्रीय मार्ग, पाणीपुरवठा योजना, सिंचन व इतर स्थानिक समस्यांचा पाढा वाचला, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या जुन्या भाषणाची टेप वाजवून दाखवीत असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्याचे सत्ताधारी महागाई, बेरोजगारी आणि शेतमालाच्या भावासाठी कसे ओरडत होते आणि आता मात्र शेतमालाला भाव नाही तर त्यावर कशी चुप्पी साधली आहे हे सांगितले. यावेळी देशमुख यांनी संजय राठोड यांच्यावरही जोरदार टीका केली. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयल केले जातील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

पवन जयस्वाल यांना वाऱ्यावर सोडणार नाही भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी जवळ बोलावून पवन जयस्वाल यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले, यांना उमेदवारी दिली होती, परंतु माघार घ्यायला सांगताच त्यांनी कोणतेच आढेवेढे न घेता पक्षादेश मानला. याला म्हणतात निष्ठा. आता जयस्वाल आणि माणिकराव ठाकरे यांची जबाबदारी मतदारांवर असल्याचे ते म्हणाले.

हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगेची तपासणी प्रचारसभेला आल्यानंतर दारव्हा येथे हेलिकॉप्टरमधून उतरताच आपल्या बॅगेची निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाषणात याबाबत संताप व्यक्त केला. आपल्यासारख्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासता का, असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना केला. लोकसभा निवडणुकीवेळी बॅगा भरभरून पैसा नेण्यात आला. तसेच यावेळीसुद्धा अनेक ठिकाणी पैसे पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा कायदा सर्वांसाठी सारखा ठेवा, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचीसुद्धा तपासणी करण्याची मागणी यावेळी ठाकरे यांनी केली.

मान खाली घालावी लागेल असे काम केले नाही - माणिकराव आपल्या जनतेच्या पाठिंब्याने राष्ट्रीय, राज्य पातळीवर काम करण्याची मला संधी मिळाली, परंतु कधीही भ्रष्टाचार, गैरव्य वहार केला नाही. जनतेला मान खाली घालावी लागेल असे कृत्य केले नसल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वीस वर्षांच्या काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तसेच पुन्हा काम करण्यासाठी संधी देण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण आहे. सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. सर्वांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठीची योजना आघाडीने आखली असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. आजची गर्दी पाहता आपला विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेYavatmalयवतमाळ