शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

लॉकडाऊनला त्रासून मागितले इच्छामरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:00 AM

कुणाल चंदूजी चांदूरकर रा. जयभारत चौक तारपुरा असे या युवकाचे नाव आहे. त्याने १३ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून लॉकडाऊनमध्ये उपासमार होऊन मरण्यापेक्षा इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. केंद्र व राज्य सरकार अनेकांना धान्य, सिलिंडर व जनधनच्या खात्यात पैसे देत आहे.

ठळक मुद्देउपासमार असह्य, तारपुरातील बेरोजगार युवकाचे थेट पंतप्रधानांकडे आर्जव

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसर्गापेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. यवतमाळातील तारपुरा परिसरातील युवकाने लॉकडाऊनच्या परिणामाची दाहकताच या अर्जातून मांडली आहे.कुणाल चंदूजी चांदूरकर रा. जयभारत चौक तारपुरा असे या युवकाचे नाव आहे. त्याने १३ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून लॉकडाऊनमध्ये उपासमार होऊन मरण्यापेक्षा इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. केंद्र व राज्य सरकार अनेकांना धान्य, सिलिंडर व जनधनच्या खात्यात पैसे देत आहे. अशा योजनांचा लाभार्थी नसलेल्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. माझ्या सारख्या अनेकांपुढे आता जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. माझा ऑनलाईन कामाचा व्यवसाय आहे. २० मार्चपासून हे काम पूर्णत: बंद आहे. सहा सदस्य असलेल्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. जवळ असलेला पैसा संपला असून आता त्यांचे पालन पोषण कसे करायचे ही समस्या आहे. अशी व्यथा मांडताना लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या काळ्याबाजाराकडेही त्याने लक्ष वेधले आहे.देशापुढील सीएए, एनआरसी या कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटला, डबघाईस आलेल्या देशातील अर्थव्यवस्थेची समस्या संपली, पोलीस विभाग लॉकडाऊनच्या काळात, अवैध दारू, गुटखा, तंबाखू या माफियांना संरक्षण देत आहे. अवैध दारू विक्री, पानठेले जोरात सुरू असून जीवनावश्यक वस्तूही दामदुप्पट भावात विकल्या जात आहे. लॉकडाऊनचा हा परिणाम असल्याचे कुणाल चांदूरकर याने आपल्या निवेदनातून मांडले आहे. या परिस्थितीमुळे व्यथित होऊनच त्याने इच्छामरणासारखा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे आदेशकुणालाच्या इच्छामरणाच्या परवानगी अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी व यवतमाळ तहसीलदार यांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्याच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिले आहे. आता कुणालने निवेदनात मांडलेली काळ्याबाजाराची परिस्थिती बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जीवनावश्यक वस्तू दुप्पट दराने विकल्या जात असल्याची व्यथा कुणालने मांडली आहे.लॉकडाऊन जरुरी, पण साईड इफेक्टही अनेकविषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असले तरी त्याचे जनजीवनावर साईड इफेक्ट होत आहे. त्याची दाहकता कुणालच्या अर्जातून पुढे आली. असे अनेक तरुण अस्वस्थ आहे. त्यांची मागणी निवेदनाच्या रुपात पुढे आली नसली तरी प्रशासनाने स्वत:हून उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या