शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019; वणी विधानसभा क्षेत्रात ३२५ मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 21:58 IST

११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

ठळक मुद्देसात केंद्र अतिसंवेदनशील : एक हजार ५२४ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.११ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन दाखल करण्याला सुरूवात झाली होती. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी विधानसभा क्षेत्रात सुरू झाली. मंगळवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर निवडणूक यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जवळपास ३२५ मतदान केंद्र आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये विद्युत व्यवस्था नसल्याने निवडणूक विभागातर्फे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सात अतिसंवेदनशील केंद्रामध्ये वणी तालुक्यातील तरोडा व भालर या केंद्राचा समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी एक हजार ५२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद शिक्षक, प्राध्यापक, वेकोलि कर्मचारी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वणी विधानसभा मतदार संघात एकुण दोन लाख ८२ हजार ५६४ मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रातील ३२ मतदान केंद्र संवेदनशिल असून या केंद्रावर चित्रीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या संवेदनशिल केंद्रामध्ये राजूर, चिखलगाव, घोन्सा, भालर, उकणी, तरोडा, कुरई, झरी तालुक्यातील कुंभा, नवरगाव, वेगाव या केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर अधिक प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी यासाठी ३० राखीव पोलिसांचे पथक गठीत केले आहे. तसेच वणी व शिरपूर पोलीस ठाण्यातील ५६ पोलीस कर्मचाºयांची ११३ मतदान केंद्रांवर नजर असणार आहे.केळापूर-आर्णी क्षेत्रात ३७३ मतदान केंद्रचंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रातील ३७३ केंद्रावर मतदान होणार आहे. विधानसभा क्षेत्रातील २९३ गावांत एकूण तीन लाख पाच हजार ७६४ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ५८ हजार ४४ पुरूष मतदार, तर एक लाख ४७ हजार ७१७ महिला मतदार आहेत. तालुक्यातील ८० गावे या मतदार संघाला जोडली असून घाटंजी तालुक्यातील १०८ गावे व आर्णी तालुक्यातील १०५ गावांचा समावेश आहे. घाटंजी तालुक्यातील १३३ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून आर्णी तालुक्यात १४० व केळापूर तालुक्यात १०० मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019