शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिमसाठी ६२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:20 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : ४२.०५ अंशाच्या उन्हातही मतदानाला गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदविण्यात आले. तर यात आणखी ९-१० टक्क्यांची भर पडून दिवसभराच्या मतदानाची सरासरी ६२ टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.गुरुवारी सकाळी ७ वाजतापासूनच मतदान केंद्रांकडे नागरिकांनी धाव घेतली होती. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी असली तरी दुपारनंतर ती चांगलीच वाढली. भर उन्हातही बहुतांश केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. प्रमुख चौकात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेंडॉल टाकून मतदारांना चिठ्ठ्या देणे सुरू केले. परंतु, यंदा मतदारयादीतील नावे शोधण्यासाठी निवडणूक विभागाने मोबाईल अ‍ॅप विकसित केल्यामुळे मतदारांचे बरेचसे काम सोपे झाले होते. प्रत्येक मतदानकेंद्रावर सहकुटुंब आलेल्या मतदारांमुळे चहलपहल जाणवली. पती-पत्नी जोडीने येऊन मतदान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. त्यातच आई-बाबांसोबत आलेल्या चिमुकल्यांनीही मतदानकेंद्रात ‘जिवंतपणा’ आणला. काही चिमुकले तर चक्क आईसोबत बॅलेट युनिटपर्यंत जाऊन आले. दिव्यांग मतदारांसाठी ठेवलेल्या व्हीलचेअर यावेळच्या मतदान प्रक्रियेचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. अनेक दिव्यांगांसह वयोवृद्धांना त्यामुळे मतदान करणे सोईस्कर झाले. मात्र एकीकडे मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत असताना अनेक मतदान केंद्रांवरच्या अवव्यस्थेने कळस गाठला.यवतमाळ शहरातील महात्मा फुले शाळेतील केंद्रावर ईव्हीएम मशीन उशिरा सुरू झाली. या गोंधळात सकाळी आलेले ३० मतदार मतदान न करताच परत गेले. अखेर सकाळी साडेसात वाजता येथील मशीन सुरू झाल्यावर मतदानाची प्रक्रिया पुढे जाऊ शकली. त्याचवेळी गर्व्हमेंट हायस्कूलच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएमही सुरू होत नव्हती. अखेर तज्ज्ञांना पाचारण करावे लागले. या ठिकाणी ‘सेव्हन डिजिट’ची अडचण उद्भवली होती. दाते कॉलेज केंद्रावर पाऊण तास विलंबाने मतदानाला सुरुवात झाली. कळंब तालुक्यातील कोठा येथील केंद्रावरही दोन तास ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता.तापमानावर स्वार मताधिकार, लोकसभ्यतेचा चमत्कारगुरुवारी सूर्याचा पारा ४२ अंशाच्या पलीकडे पोहोचलेला होता. मात्र या तळपत्या उन्हातही लोकांनी लोकशाहीची सभ्यता पाळत मतदानासाठी मतदान केंद्रांवर धाव घेतली होती. सकाळी अत्यल्प प्रमाणात झालेले मतदान दुपारच्या सुमारासच खºया अर्थाने वाढल्याची बाब निदर्शनास आली. एकीकडे तापमानाचा चढता पारा आणि दुसरीकडे मतदानाची वाढती टक्केवारी अशी स्पर्धाच या निमित्ताने रंगली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कर्तव्य जिंकलेयांनी बजावला मतदानाचा हक्कपालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार हरिभाऊ राठोड, आमदार मनोहरराव नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार नीलय नाईक आदींनी मतदान केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019