शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Lok Sabha Election 2019; देश सुरक्षित हवा असेल तर युतीला मतदान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ/वणी : आम्ही राष्ट्रप्रेमाखातर भाजपशी असलेले मतभेद गाडून टाकलेत. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एका ...

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : यवतमाळ, वणीत जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/वणी : आम्ही राष्ट्रप्रेमाखातर भाजपशी असलेले मतभेद गाडून टाकलेत. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एका विचाराचे आहेत. देशाची सुरक्षा हवी असेल तर शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.सोमवारी दुपारी वणी आणि सायंकाळी यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. भाजप आणि शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष असले तरी त्यांचे विचार एक आहेत. आमच्यात मतभेद असतील. परंतु आमचे कुटुंब एक आहे. त्यामुळे मतभेद बाजुला सारून एक झालो आहोत. यापुढेही ही एकता कायम राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.कॉंग्रेस आणि भाजप-सेना या दोन्ही पक्षाचे जाहीरनामे बघा. भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिर बांधण्याचे अभिवचन आहे. ३७० कलम कधीही रद्द करण्याची ग्वाही या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे. कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा कळवळा दाखवू नये, ईतकी वर्षे कॉंग्रेसने या देशावर राज्य केले. या काळात शेतकऱ्यांचे काय हाल झालेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉंग्रेसच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेसवाल्यांनी भाजप हा पक्ष लालकृष्ण अडवाणींना कशी वागणूक देत आहे, हे पाहण्यापेक्षा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांना आपण कशी वागणूक दिली, याचा विचार करावा. वागणूक कशी द्यायची हे कॉंग्रेसने आम्हाला शिकवू नये, असेही ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या, वणीतील गोळीबार, गोवारी बांधवांना न्यायालयाने दिलेला न्याय आदी मुद्यांनाही हात घातला. माणिकराव ठाकरेंचे डिपॉझिट जप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. यवतमाळातील सभेच्या व्यासपीठावर डॉ. दीपक सावंत, ना. संजय राठोड, ना. मदन येरावार, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, प्रकाश डहाके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, किशोर तिवारी तर वणीतील सभेला ना. हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी आमदार विश्वास नांदेकर, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.काँग्रेसचा जाहीरनामा घातककॉंग्रेसचा जाहीरनामा अतिशय घातक असून घटनेतील १२४ कलम रद्द करण्याची भाषा केली जात आहे. हे कलम रद्द केल्यास देशद्रोह्यांवर खटले भरता येणार नाहीत. त्यामुळे जे देशद्रोही असतील तेच कॉंग्रेसला मतदान करतील, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम