शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Lok Sabha Election 2019; शिवसेनेला रस्त्यावरचे वैर धोकादायक काँग्रेसला सामाजिक तणावाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:36 IST

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची भूमिका निर्णायक : सामाजिक संवेदनशील शहरात फिरु शकतो निकालयवतमाळ, कारंजा, पुसद ठरू शकतात निर्णायक

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान हे यवतमाळ विधानसभेत आहेत. येथील तीन लाख ६३ हजार ६३८ मतदारांपैकी ७० टक्के मतदार एकट्या यवतमाळ शहरात आहे. यवतमाळातील पालिकेच्या राजकारणात शिवसेना-भाजप एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. या वैराचा फटका शिवसेना उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदारसंख्या वाशिम मतदारसंघात आहे. तेथे तीन लाख ४० हजार ८०२ मतदार आहेत. यातील ६० टक्के मतदार वाशिम शहरात आहे. या ठिकाणी सामाजिक समीकरणांचा फटका बसण्याची शक्यता आहे. येथेही सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये अगदी रस्त्यावरचे वैर आहे. मतदान काढताना याचा प्रभाव पडल्यास युतीच्या उमेदवाराला मायनस करू शकतो. कारंजा शहरात विधानसभेतील ४० टक्के मतदार आहेत. सामाजिक दृष्ट्या संवेदनशील शहर असून त्याचा प्रभाव राहणार आहे. एका गटाकडे किंवा समाजाकडे गेल्यास दुसरा गट व समाज उमेदवारापासून दूर होतो. याचा फटका आघाडीतील उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत. दिग्रस शहरात आघाडीच्या उमेदवाराला अल्पसंख्यक घटकातून अपेक्षित मदत मिळण्याची चिन्हे नाहीत. उलट दिग्रस व दारव्हा येथे काही प्रमाणात सहानुभूतीची लाट तयार होत आहे. राळेगाव व कळंब या दोन तालुक्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी विधवेबद्दल वेगळे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे युती व आघाडीच्या उमेदवाराला येथे चांगला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. पुसदमध्ये ‘नाईक पॅटर्न’ किती यशस्वी होतो यावर आघाडीचे भवितव्य आहे. येथे समाज म्हणून मतदान झाल्यास अपक्षाला ताकद मिळण्याची चिन्हे आहेत.युती, आघाडीपुढे प्रहार, वंचित, भाजप बंडखोराचे आव्हानशिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांना यापूर्वी २००९ व २०१४ मध्ये राळेगाव विधानसभेतून भक्कम आघाडी मिळाली होती. दिग्रस विधानसभेतही युतीचे गणित जुळले होते. या निवडणुकीत परिस्थिती बदलली असून येथे ग्राफ खाली येण्याची भीती आहे.आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता विभाजनाचा फटका यवतमाळ शहरात कमी होण्याची चिन्हे आहेत. तसेच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील वैराचा फायदा होऊ शकतो.प्रहार की अपक्ष प्रहार जनशक्तीच्या शेतकरी विधवा आणि समाज आणि धनशक्तीसह युतीतील नेत्यांचा छुपा पाठिंबा यावर अपक्ष उमेदवार आपला क्रमांक वाढविण्यासाठी लढत देऊ शकतो. यांना ग्रामीण मतदारांची साथ लाभण्याची स्थिती आहे. या दोनही उमेदवारांकडून प्रचार मोहीम जोरात राबविली जात आहे. यासाठी विविध माध्यमे वापरण्यात येत आहे.2009राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, वाशिम या चार मतदारसंघातून शिवसेनेला भक्कम लिड मिळाली होती.2014पुसद वगळता मोदी लाटेत राळेगाव, कारंजा, वाशिम, यवतमाळ येथे सेनेचा लिड वाढला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम