शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Lok Sabha Election 2019; काँग्रेसमध्ये गटबाजी नाहीच, तिकीट मागणे हा सर्वांचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:30 IST

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांमुळे मतदारसंघातील मतदार काँग्रेस संस्कृतीशी एकरूप आहेत. जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : भाजप बंडखोर, वंचित, प्रहारचा धोका सेनेलाच

यवतमाळ : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांमुळे मतदारसंघातील मतदार काँग्रेस संस्कृतीशी एकरूप आहेत. जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी नसून तिकीट मागणे हा सर्वांचा हक्क आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या सर्वच उमेदवारांमध्ये प्रचाराची चुरस निर्माण झाली आहे. याच धावपळीत ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर विश्लेषण मांडले.राज्याच्या राजकारणात २५ वर्षे घालवूनही लोकसभेच्या तिकिटासाठी संघर्ष का करावा लागला, या प्रश्नावर माणिकराव ठाकरे म्हणाले, गेल्यावेळी राहुल ठाकरे यांना ऐनवेळी तिकिट नाकारण्यात आले. मला विधानपरिषदेचे तिकिट नाकारतानाच पक्षनेतृत्वाने लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार जुलैपासूनच मी तयारी सुरू केली. उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांनाच आहे. काँग्रेसच्या पद्धतीनुसार चार टप्प्यांवरून नावे पक्षश्रेष्ठींकडे जातात, त्यातूनच एक उमेदवार ठरतो. पण अनेक जणांनी उमेदवारी मागितली यात मला काही वावगे वाटत नाही.पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागतोय का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षात गटबाजी एवढी तीव्र नाही. अनेकांनी उमेदवारी मागितली म्हणजे ते आपले विरोधक आहे, असा त्याचा अर्थ नाही. तिकीट मागणारे असे सर्वच जण प्रचाराला लागले आहेत.या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नसताना आपण कशाच्या बळावर लोकसभा जिंकण्याची आशा बाळगता, यावर ठाकरे म्हणाले, ही राष्ट्रीय निवडणूक आहे. यात धोरणात्मक निर्णय घेतले जातात. सलग चार वेळा निवडूण दिलेल्या सेनेच्या खासदारांचा लोकांना मिळालेला अनुभव वाईट आहे. त्यामुळे खाली कुणाची ताकद आहे, किती आमदार आहे, यापेक्षा लोकांची भावना काय आहे, हेच महत्त्वाचे आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात कोणते मोठे काम झाले की ज्या आधारावर तुम्ही मते मागणार आहात, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था शक्य तेवढी वाढविण्याचे आम्ही प्रयत्न केले. बेंबळा प्रकल्प, मध्यम, लघु प्रकल्प, पांदण रस्त्यांची योजना, वीज बिल माफी, पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ, त्यांना फुल्ल ड्रेस, आधुनिक ट्रेनिंग प्रणाली, सर्कल इन्स्पेक्टरचे पद रद्द करून डीवायएसपी, अ‍ॅडीशनल एसपीच्या पदांची निर्मीती, जिल्ह्यात ३२ केव्हीचे ११ वीज उपकेंद्र, क्षमता वाढ, पारस (अकोला) येथील वीजनिर्मिती प्रकल्पाचे पुनरूज्जीवन आदी कामे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत.खासदार निधीचे १०० कोटी गेले कुठे?शिवसेनेच्या भावना गवळी सलग चार वेळा खासदार आहेत. दरवर्षी २५ कोटी प्रमाणे किमान शंभर कोटी त्यांना खासदार फंड मिळाला. मात्र आज आम्ही एवढ्या गावात फिरताना कुठेही खासदार निधीतून झालेल्या कामाचा फलक दिसला नाही. मग खासदार निधीतील हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला.‘वेगळा विदर्भ’ हाही जुमलाच२०१४ मध्ये भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर मते मागितली. मात्र आजपर्यंत वेगळा विदर्भ झाला नाही. २०१९ च्या निवडणुकीत तर विदर्भाचा मुद्दाही भाजपच्या प्रचारात दिसत नाही. त्यामुळे भाजपचे वेगळ्या विदर्भाचे आश्वासन ‘जुमला’ ठरले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019